मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नागरिकत्व कायदा रद्द करण्याची काँग्रेसकडून मागणी केली जात आहे. त्यासाठी काँग्रेसने गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आंदोलन करून या कायद्याला विरोध केला. तसेच ज्या राज्यात काँग्रेसची सत्ता आहे त्या राज्यामध्ये हा कायदा लागू करणार नसल्याची भूमिका काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली आहे. असे असताना काँग्रेसचे राष्ट्रीय नेते वेगळीच भूमिका मांडताना दिसत आहे. त्यामुळे सीएए वरून काँग्रेसमध्ये संभ्रम असल्याचे पहायला मिळत आहे.
सीएए कायदा लागू करण्यासाठी कोणतेही राज्य नकार देऊ शकत नाही, असे वक्तव्य काँग्रेसचेच नेते आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केले. तर आता सलमान खुर्शीद यांनी त्याचाच पुनरुच्चार केला आहे. संविधानिक पातळीवर सीएए राज्यात लागू करण्यास कोणतेही राज्य नकार देऊ शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र, असे असतानासुद्धा राज्यातील नेते मात्र वेगळीच भूमिका मांडत आहेत.
सीएए कायदा लागू करण्यासाठी कोणतेही राज्य नकार देऊ शकत नसल्याचे राष्ट्रीय नेते म्हणत असताना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी हा कायदा राज्यात लागू होऊ देणार नसल्याचे बोलत आहेत. त्यामुळे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि स्थानिक नेत्यांमध्ये या कायद्यावरून संभ्रम असल्याचे दिसून येत आहे.
- पालकांनो सावधान ! मुलांच्या बौद्धिक क्षमतेबाबत शास्त्रज्ञांनी सांगितले ‘हे’ 6 मुद्दे
- जेवल्यानंतर पिऊ नका थंड पाणी ! ‘हे’ आहेत 4 धोके, जाणून घ्या
- ‘या’ 9 समस्यांवर केवळ एकच सहज सोपा उपाय, जाणून घ्या कोणता
- ‘या’ 4 कारणांमुळे सतत होतो सर्दी-खोकल्याचा त्रास
- मातीच्या तव्यावरील चपाती खाण्याचे 3 फायदे ! अशी घ्या काळजी
- सायकल चालवल्याने ‘या’ 4 रोगांचा धोका होतो कमी ! जाणून घ्या
- हात धुण्यासाठी 20 सेकंदांचा वेळ आवश्यक, ‘या’ 5 स्टेप्स वापरा