ममता बॅनर्जी सरड्यासारख्या रंगबदलू : अधीर रंजन चौधरी 

कोलकाता : वृत्तसंस्था
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यूपीएच्या नेत्या सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची नुकतीच भेट घेतली. यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी, ममता या सरड्यासारख्या रंगबदलू आहेत. त्यांच्यावर काडीचाही विश्वास ठेवू शकत नाही अशी जोरदार टीका केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, काँग्रेस आणि अन्य नेत्यांनी त्यांच्यावर भरवसा ठेवू नये. ममतांमध्ये पंतप्रधानपदाची लालसा निर्माण झाली आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. ममता या ‘ट्रोझन हॉर्स’सारख्या (स्वार्थासाठी इतरांचा वापर करून घेणे) वागत आहेत. संघाचे विचार मांडून त्या एकत्र आलेल्या विरोधकांना पुन्हा वेगले करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे सांगून त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका, असे आवाहन चौधरी यांनी अन्य पक्षांच्या नेत्यांना केले आहे. देशाचे पंतप्रधान होणे हा ममतांचा एकमेव उद्देश आहे. पंतप्रधानपदाची लालसा निर्माण झाली आहे. त्यांच्यात देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल यांची लक्षणे आहेत. पश्चिम बंगालमधून काँग्रेसला हद्दपार करण्याचा आणि पुढील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे समर्थन मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा आरोपही त्यांनी केला.
 [amazon_link asins=’B01G36KPGI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1895e53c-9704-11e8-8915-43cb2eed76fc’]
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये ममता अधिक जागा पदरी पाडून घेण्याचा प्रयत्न करत असून, पुढील लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी दावा करू शकतात. एकीकडे राहुल गांधी विरोधकांना एकत्र आणण्यासाठी चर्चा करत आहेत, तर ममता तिसऱ्या आघाडीची चर्चा करून विरोधकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.