काँग्रेसकडून मुख्यमंत्री ठाकरेंना ‘सल्ला’, CAA वर जाहीररित्या बोलण्यापुर्वी समजून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन वाद होण्याची शक्यता आहे. आज दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीएए कायद्यावरुन लोकांना जास्त घाबरण्याचं कारण नाही असं जाहीर वक्तव्य केलं होतं मात्र एकत्र सत्तेत असणाऱ्या काँग्रेस ने यावर आक्षेप घेतला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सीएए कायद्याबाबत नीट माहिती दिली पाहिजे असं याबाबत काँग्रेसचे नेते मनिष तिवारी यांनी ट्विट करुन म्हटल आहे. तसेच सीएए कायद्याकडे भारतीय संविधानाच्या दृष्टीने पाहिलं पाहिजे कारण धर्माच्या आधारे नागरिकत्व दिलं जाऊ शकत नाही असं मनिष तिवारी यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरेंच्या विधानाचा समाचार घेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनीही सीएएबाबत त्यांनी जाहीरपणे समर्थन करु नये असे म्हटले आहे. पृथ्वीराज चव्हाणांनी असं म्हटलं आहे कि त्यांना कुणीतरी समजवावं लागेल, मला संधी मिळाल्यास मी समजावेन.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते
मी CAA , NRC समजावून घेतले आहे. केंद्राने प्रसिद्ध केलेली प्रश्नोत्तरेही तपासली. त्यामुळे ज्यांनी आंदोलन भडकावले त्यांनी ते समजून घ्यावे. त्यानंरच मत सांगावे, महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. सरकार पाच वर्षे पूर्ण करेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

CAA , NRC राज्यात लागू देणार नाही असे काँग्रेस ने म्हटले आहे. CAA ला शिवसेनेने लोकसभेत पाठिंबा दिला होता तर राज्यसभेत आक्षेप घेत सभात्याग केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मोदी भेटीनंतर सीएए कायद्याबाबत सकारात्मक संकेत दिले. त्यामुळे या मुद्द्यावरुन काँग्रेस – शिवसेना यांच्यात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

नागरिकत्व सुधारणा कायदा CAA देशहिताचा आहे. देशवासीयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजप देशासाठी काम करतो, व्होट बँकेसाठी काम करत नाही अशा शब्दात भाजपाने काँग्रेसवर टीका केली होती.