मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज सकाळी महाराष्ट्रात जे काही कांड झालं त्याचे वर्णन करायला शब्द नाहीत. आमच्याकडून उशीर झाला नाही, राष्ट्रवादीतील काही लोकांनी भाजपशी संधान साधलं, त्यामुळे ही सर्व परिस्थिती ओढावली असे काँग्रेस वरिष्ठ नेते अहमद पटेल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. आमचे आमदार एकत्र आहेत, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, आमचे सरकार अजूनही येऊ शकतं असेही अहमद पटेल यांनी स्पष्ट केले.
कॉंग्रेसचे सर्व आमदार एकत्र आहेत : मा. अहमद पटेल pic.twitter.com/xhnLIDTOgz
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) November 23, 2019
रात्रीत राजकारणाच्या पटलावरील फासे पलटले आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर काँग्रेसने स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन झालेल्या प्रकाराचे खापर राष्ट्रवादीवर फोडले.
Ahmed Patel, Congress: We will fight this on both fronts, political and legal. #Maharashtra https://t.co/77euYvgmTa pic.twitter.com/55mFDAPLh7
— ANI (@ANI) November 23, 2019
अहमद पटेल म्हणाले की आमची कालची चर्चा चांगली झाली. भाजपने राज्यात घाईत शपथविधी उरकला, सत्तास्थापनेची ही रात्रीत केलेली घाई पाहून हे लक्षात येते की यात काहीतरी काळबेरं आहे. हे स्थापन झालेले सरकार कायद्याला धरुन नाही. आम्ही तिन्ही पक्ष मिळून फडणवीस सरकारचा पराभव करु.
ज्याप्रकारे शपथविधी उरकला, ते पाहता काहीतरी काळंबेरं असल्याची मला खात्री आहे: मा. अहमद पटेल pic.twitter.com/CtS5PBjuu3
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) November 23, 2019
काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेबरोबर सत्तास्थापनेला विरोध केला होता. आता भाजपने अजित पवार यांना जोडीला घेऊन सरकार स्थापनेचा दावा करुन शपथविधी घेतला. त्यानंतर देखील निरुपम यांनी सांगितले की हे योग्यच आहे. याविषयी विचाराल्यावर अहमद पटेल म्हणाले की संजय निरुपम यांची भूमिका म्हणजे पक्षाची भूमिका नाही.
Ahmed Patel,Congress: Today was a black spot in the history of Maharashtra. Everything was done in a hushed manner and early morning. Something is wrong somewhere. Nothing can be more shameful than this. pic.twitter.com/MHpahKkE2A
— ANI (@ANI) November 23, 2019
त्यानंतर आज शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. या दरम्यान अजित पवारांवरील कारवाईचा निर्णय बैठकीत घेण्यात येईल. अजित पवार यांच्याबाबत निर्णय निश्चित घ्यावा लागेल आणि घेतला जाईल असे शरद पवारांनी सांगितले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकासआघाडीचे सरकार येणार असा दावा केला. शिवसेनाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वावर तिन्ही पक्षात चर्चा सुरू आहे. कुठलेही संकट आले तरी देखील एकत्र राहणार, आम्ही तिघे एकत्र आहोत आणि एकत्रच राहणार असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
Ahmed Patel,Congress: All the three(Congress-NCP-Shiv Sena) parties are together in this and I am confident we will defeat BJP in the trust vote. All Congress MLAs are present here except two who are right now in their village, but they too are with us. pic.twitter.com/s0snX0yQNm
— ANI (@ANI) November 23, 2019
Visit : Policenama.com
- सुगंधी तेलच्या मसाजने होतील ‘हे’ ८ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या
- थंडीत गरम कपडे परिधान कराच, अन्यथा बिघडू शकते आरोग्य, लक्षात ठेवा ४ गोष्टी
- आहारात ‘व्हिटॅमिन सी’ हवेच, अन्यथा होऊ शकतात ‘या’ ५ आरोग्य समस्या
- शारीरिक हालचाल आवश्यकच, अन्यथा शरीरात होतील ‘हे’ ८ बिघाड!
- थंडीमुळे ओठ पांढरे पडलेत, फाटलेत का? मग करा ‘हे’ ६ घरगुती उपाय
- ‘हे’ ५ व्हिटामिन्स शरीरासाठी आवश्यक, कमतरतेमुळे होतात ‘या’ आरोग्य समस्या
- मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘हे’ ५ पदार्थ नियमित करा