दिल्ली :वृत्त संस्था – काँग्रेसने आज राज्यातील ५ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केलेली आहे. हा निर्णय दिल्लीमध्ये झाला आहे. राज्यामध्ये ४८ जागा आहेत त्यापैकी ५ जणांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे. आज जाहिर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये पुण्याचे नाव नसल्याने सस्पेंन्स निर्माण झाला आहे. उमेदवाराचे नाव आणि त्यापुढील कंसात मतदार संघाचे नाव पुढील प्रमाणे…
नाना पटोले (नागपूर), डॉ. नामदेव दल्लूजी उसेंडी (गडचिरोली-चिमूर), प्रिया दत्त (मुंबई उत्तर मध्य), मिलींद देवरा (दक्षिण मुंबई), सुशिलकुमार शिंदे (सोलापूर), ओमवती जटाव (नगिना), राज बब्बर (मोरादाबाद) जाफर अली नक्वी (खेरीतून), कैसर जहाँ (सितापूरमधून), मंजरी राही (मिसरिख), रामशंकर भार्गव (मोहनलाल गंज), डॉ. संजय सिंह (सुल्तानपूर), रत्ना सिंह (प्रतापगढ), श्रीप्रकाश जैस्वाल (कानपूर), राकेश सचन (फतेहपूर), साध्वी सावित्रीबाई फुले (बहारिच), परवेझ खान (संत कबीर नगर), कुश सौरभ (बंसगाव), पंकज मोहन सोनकर (लालगंज), ललितेश त्रिपाठी (मिर्झापूर) आणि भगवती प्रसाद चौधरी (रॉबर्ट्सगंज) या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
ह्याही बातम्या वाचा-
कृष्णकुंजवर तयारी सुरू… लोकसभेची नाही तर…
लोकसभा २०१९ : असा असेल मोदींच्या सभांचा झंझावात
पवारांनंतर आता सुभाष देशमुख यांचाही माढ्यातून यु-टर्न