हैदराबाद : वृत्तसंस्था – मोहन भागवत यांनी 130 कोटी भारतीयांना हिंदू म्हटले होते. याच वक्तव्यावरून काँग्रेसचे वरिष्ठ नेता व्ही. हनुमंता राव यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. मोहन भागवत यांनी लोकांच्या भावनांचा अवमान केला असल्याचे हनुमंता राव यांनी तक्रारीत म्हटले आहे. भागवत यांच्या वक्तव्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असून हे हैदराबादमधील कायदा सुवव्यस्थेसाठी योग्य नाही, असेही राव यांनी म्हटले आहे.
हैदराबाद येथील एलबी पोलीस ठाण्यात व्ही. हनुमंता राव यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक रेड्डी यांनी या तक्रारीबाबत दुजोरा दिला आहे. काँग्रेस नेते राव यांच्याकडून यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र, याप्रकरणी खटला दाखल होऊ शकतो की नाही, याबाबत कायदेशीर सल्ला घेण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक राव यांनी दिली.
दरम्यान, मागील चार दिवसांपुर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी हिदुत्वासंदर्भात मोठे वक्तव्य केले होते. संघाच्या दृष्टीकोनातून देशातील 130 कोटी जनता हिंदूच आहे. देशातील लोकांची धर्म आणि संस्कृती काहीही असो ते हिंदूच आहेत, असे विधान मोहन भागवत यांनी केले होते. तसेच जे लोक राष्ट्रवादी आहेत. भारतीय संस्कृतीचा सन्मान करतात ते सर्व हिंदू आहेत, असेही मोहन भागवत यांनी म्हटले होते.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- किवी फळाचे ‘हे’ आहेत ७ आरोग्यायी फायदे, जाणून घ्या
- ‘या’ ४ रक्तगटानुसार ठरवा कोणता चहा प्यायचा ! जाणून घ्या
- ‘चिकन सूप’ प्या, मानसिक ताण दूर पळवा ! ‘हे’ ५ पदार्थ नियमित खा
- दही-भात खाण्याचे ‘हे’ ७ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?
- जेवण स्वादिष्ट बनवणारा ‘तेजपत्ता’ या ७ समस्यांवर आहे गुणकारी
- ‘या’ ५ गोष्टी कमी करतील तुमचे ‘हाय ब्लड प्रेशर’, जाणून घ्या
- रात्री केस धुवून झोपत असाल तर ‘या’ ७ गोष्टींचा आहे धोका !