काँग्रेसमध्ये घमासान सुरुच ! कपिल सिब्बल यांच्या नव्या ट्विटमुळे पुन्हा वादाची शक्यता
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसमध्ये अद्यापही घमासान सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांचे नवीन ट्विट पुन्हा एकदा वाद निर्माण करु शकते. ज्यावेळी तत्त्वांसाठी लढा चालू असतो, त्यावेळी विरोध नेहमी ऐच्छिक असतो आणि समर्थन नेहमी व्यवस्थापित करण्यात येतो, असे कपील सिब्बल यांनी आज म्हटले आहे.
कपिल सिब्बल यांनी यापूर्वी माझ्यासाठी पद नाही तर देश महत्त्वाचा आहे, असे ट्विट केले होते. तर आज त्यांनी पुन्हा एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी, ज्यावेळी तत्त्वासाठी लढा दिला जात आहे, तर आयुष्यात, राजकारणात, न्यायामध्ये, सामाजिक कार्यामध्ये, सोशल मीडिया मंचावर ऐच्छिक असतात. मात्र, समर्थन बरेचदा व्यवस्थापित केले जाते, असे कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे.
यापूर्वी कपिल सिब्बल यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून संघटनेत सर्वसमावेशक बदल करण्याची आणि पूर्णवेळ अध्यक्षांची मागणी केली होती. तसेच पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांसह 20 हून अधिक सदस्यांनी पूर्णवेळ अध्यक्ष निवडीबाबत पत्र लिहिले होते. त्यामुळे पक्षात वाद निर्माण झाला होता. मात्र, काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत सोनिया गांधी यांची पुन्हा पक्षाच्या हंगामी अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली आहे.
When fighting for principles
In life
In politics
In law
Amongst social activists
On social media platformsOpposition is often voluntary
Support is often managed
— Kapil Sibal (@KapilSibal) August 26, 2020
संजय झा यांचा काँग्रेसवर निशाणा
काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या संघर्षावर पक्षातून निलंबित करण्यात आलेल्या संजय झा यांनी देखील काँग्रेसवर निशाणा साधला आहे. संजय झा यांनी म्हटले आहे की, ही अंताची सुरुवात आहे. अशा शब्दात झा यांनी काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या संघर्षावर भाष्य केलं आहे. झा यांनी केलेल्या ट्विटमध्ये कोठेही काँग्रेसचा उल्लेख केला नाही. मात्र त्यांचा निशाणा काँग्रेसवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
This is just the end of the beginning.
— Sanjay Jha (@JhaSanjay) August 25, 2020