मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय जनता पक्षाने सत्तेत येण्यासाठी विधानसभेवेळी अनेक राजकीय पक्षांतील आयारामांना संधी दिली खरी परंतु भाजपचे नुकसान झाले. मेगाभरती चुकीची होती अशी कबुली खुद्द चंद्रकांत पाटलांनी दिली. यावरुन काँग्रेसचे प्रवक्ते सचिव सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
भाजपने विरोधी पक्षातील नेत्यांना फोडून साम, दाम, दंड, भेद वापरुन सत्तेसाठी मेगाभरती केली, मात्र आता भाजपला मेगाभरती ही चूक असल्याचे वाटत असल्याचा टोला सावंत यांनी लगावला.
विरोधी पक्ष फोडण्यासाठी साम दाम दंड भेद वापरून सत्तेकरीता केलेली मेगाभरती आता @BJP4Maharashtra ला चुकीची वाटतेय. गुंड व भ्रष्टाचारीही जमा केल्याने अत्यंत हीन पातळीवर गेलेल्या भाजपाला GET WELL SOON हा सल्ला आहे. भाजपात गेलेले घरके न घाट के झाले पण काँग्रेसचे शुध्दीकरण मात्र झाले!
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) January 18, 2020
गुंड आणि भ्रष्टाचारी लोकांना जमा केल्याने अत्यंत हीन पातळीवर गेलेल्या भाजपने ‘आता तरी सुधरावे’ असा सल्ला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत द्यायचे विसरले नाही. भाजपात गेलेले ‘घर के ना घाट के’ असून काँग्रेसचे मात्र यामुळे ‘शुद्धीकरण’ झाले असा खोचक टोला देखील त्यांनी गयारामांना लगावला.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- ‘हळदीच्या चहा’चे 4 प्रकार आणि 4 आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या
- Blood Pressure : रक्तदाबावर उपाय सुचविणारे यंत्र, जाणून घ्या 4 महत्वाच्या गोष्टी
- तुमच्या घरातच असते 10 ते 30 टक्के अधिक प्रदूषण, जाणून घ्या माहिती
- आनंदी राहण्यासाठी ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या ‘मानसशास्त्र’
- गोळ्यांपेक्षा नैसर्गिक पद्धतीने घ्या ‘ड जीवनसत्त्व’, या 7 गोष्टी लक्षात ठेवा
- आहारामध्ये ‘या’ 6 पदार्थांचा समावेश केल्यास टळेल स्तनाच्या कर्करोगाचा धोका !