‘भाजपला आता साम,दाम दंड, भेद वापरून केलेली मेगाभरती चुकीची वाटू लागली’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय जनता पक्षाने सत्तेत येण्यासाठी विधानसभेवेळी अनेक राजकीय पक्षांतील आयारामांना संधी दिली खरी परंतु भाजपचे नुकसान झाले. मेगाभरती चुकीची होती अशी कबुली खुद्द चंद्रकांत पाटलांनी दिली. यावरुन काँग्रेसचे प्रवक्ते सचिव सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

भाजपने विरोधी पक्षातील नेत्यांना फोडून साम, दाम, दंड, भेद वापरुन सत्तेसाठी मेगाभरती केली, मात्र आता भाजपला मेगाभरती ही चूक असल्याचे वाटत असल्याचा टोला सावंत यांनी लगावला.

गुंड आणि भ्रष्टाचारी लोकांना जमा केल्याने अत्यंत हीन पातळीवर गेलेल्या भाजपने ‘आता तरी सुधरावे’ असा सल्ला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत द्यायचे विसरले नाही. भाजपात गेलेले ‘घर के ना घाट के’ असून काँग्रेसचे मात्र यामुळे ‘शुद्धीकरण’ झाले असा खोचक टोला देखील त्यांनी गयारामांना लगावला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/