माझे घर का जाळले, बंगळुरु हिंसाचारानंतर काँग्रेस आमदाराचा संतप्त सवाल !

पोलिसनाामा ऑनलाईन – बंगळुरुत एका फेसबुक पोस्टवरुन झालेल्या हिंसाचारात तिघांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. यामध्ये 12 हून अधिक पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश आहे. संतप्त जमावाने दोन पोलीस ठाण्यांसोबत काँग्रेस आमदार श्रीनिवास मूर्ती यांच्या घरावरही हल्ला केला होता. श्रीनिवास मूर्ती यांच्या घराचे प्रचंड नुकसान झाले आहे. माझे घर का पेटवलंत ? असा सवाल त्यांनी हल्लेखोराना विचारला आहे.

जर मी काही चूक केली असेल तर तुम्ही पोलीस किंवा प्रसारमाध्यमांकडे जाऊ शकता. मी काहीच केले नसताना हा हल्ला दुर्दैवी आहे, अशी भावना श्रीनिवास मूर्ती यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या भाच्याने धार्मिक तेढ निर्माण करणारी एक फेसबुक पोस्ट केली होती. यानंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार करण्यात आला. श्रीनिवास मूर्ती यांनी हिंसाचाराचा निषेध केला आहे. माझा भाचा, बहिणीचा मुलगा..कोणीही असो. चूक झाली असेल तर पोलीस त्याची शिक्षा देतील. माझ्या घराला शिक्षा कशासाठी? मी काय चूक केली होती ? हे खूप वाईट आहे. माझ्या घराची पुढची बाजू पूर्णपणे जळाली आहे. काहीच राहिलेलेल नाही, जळून खाक झाले आहे सगळे असेही त्यांनी सांगितले. हल्ला झाला तेव्हा कुटुंब घरात नव्हते. माझे कुटुंब सुरक्षित आहे. पाच मिनिटे आधीच कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यासाठी मंदिरात गेले होते. याचवेळी जमावाने घऱावर हल्ला केला असल्याचे त्यांनी सांगितले. या मतदारसंघात मला एक लाख मते मिळाली आहे. मी जनतेचा सेवक आहे. आपण सर्व बहिण-भाऊ आहोत. श्रीनिवास मूर्ती यांनी हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा आरोप केला आहे.