पोलिसनामा ऑनलाईन टीम – भारतीय जनता पक्षाकडून अभिनेता सुशांतच्या मृत्यूचा राजकीय ट्रम्प कार्डसारखा वापर केला जात आहे. बिहार निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे राजकारण केले जात असल्याचा आरोप काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी केला आहे. रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे त्यामध्ये तिच्यावर वेगळा गुन्हा आहे. तिला कोणत्याही पुराव्यांशिवाय अटक करण्यात आली आहे. बिहारच्या जनतेला फक्त भाजपा न्याय देऊ शकते असे चित्र रंगवण्याचा प्रयत्न या सगळ्या प्रकारातून होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
The BJP is using #SushantSinghRajput's death as a major political trump card for the upcoming Bihar elections. Rhea Chakraborty is being persecuted on different charges without proof. They are trying to portray that only BJP can deliver justice to Biharis: Adhir Ranjan Chowdhury pic.twitter.com/oBdxQjFzPm
— ANI (@ANI) September 10, 2020
मुंबईतील राहत्या घरी सुशांतने आत्महत्या केल्यानंतर बॉलिवूड हादरले होते. मात्र, त्याच्या आत्महत्येनंतर काही दिवसातच बॉलिवूडच्या कंपूशाहीचा बळी असल्याची टीका करण्यात आली. त्याशिवाय मुंबई पोलिसांवर तक्रार वेळेत न घेतल्याचा आरोप झाला. हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आल्यानंतर अभिनेत्री कंगना रणौत हिनेही काही आरोप केले होते. दरम्यान, याआधीही बिहार निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकारण केले जात आहे असा आरोप झाला होता. आता काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी सुशांतच्या मृत्यूचे राजकारण केले जात असल्याचे म्हटले आहे.