काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट पत्र

मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार स्थापन होताना किमान समान कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. यामध्ये दलित आणि आदिवासी विकासासाठी नियोजित कार्यक्रम करण्याचे ठरले होते. याचीच आठवण करून देण्यासाठी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत दलित आणि आदिवासींच्या योजनांवर सरकारने लक्ष केंद्रित करावे अशी भूमिका काँग्रेस नेत्यांची होती. त्याचा संदर्भ देत सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र पाठवले आहे.

पत्रातील महत्वाचे मुद्दे

मुख्यमंत्र्यांना समान कार्यक्रमाची आठवण करून देणार्‍या या पत्रात सोनिया गांधी यांनी महत्वाच्याभूमिका मांडल्या आहेत. या पत्रातील महत्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे…

* अनुसूचित जाती /जमातींसाठी योजना आणि त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा पत्रात उल्लेख.

* राज्यातील सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास निधी कमी केला गेला आहे. असे न करता आदिवासी आणि दलित समाजासाठी निधी उपलब्ध करून द्यावा.