‘फडणवीस सरकारनं मुंबईकरांचा विश्वासघात केला हे सिध्द करून दाखवणार’ : सचिन सावंत

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   तत्कालीन फडणवीस सरकारने (Fadnavis Government ) मागची 5 वर्ष मुंबईकरांची फसवणूक केली. मुंबई मेट्रो प्रकल्पाभोवती मागची 5 वर्ष भाजपने राजकारण केले आणि मुंबईकरांना फसवले, असा आरोप कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Congress spokesperson Sachin Sawant) यांनी पत्रकार परिषदेत केला.

एवढेच नाही तर मी माझे हे म्हणणे कागदोपत्री सिध्द करून दाखवेन, असेही सावंत यांनी म्हटले आहे. मेट्रो कारशेडचा प्रकल्प कांजुरमार्गला हलवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतला. त्यानंतर राज्य सरकारने प्रस्तावित केलेली जागा केंद्राची असल्याचे पत्रच केंद्र सरकारकडून राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवण्यात आले. त्यानंतर भाजपा विरोधात महाविकास आघाडी सरकार असा जोरदार सामना पाहण्यास मिळत आहे.