सोनिया व राहुल गांधींना हात लावल्यास जनता रस्त्यावर उतरेल : चव्हाण

वाशिम : पोलीसनामा आॅनलाइन – सोनिया गांधी, राहुल गांधी यांना आम्ही बघून घेऊ, ही भाषा पंतप्रधानांना शोभत नाही. जनतेने जोपर्यंत आम्हाला सन्मानाने पदावर बसविले तोपर्यंत आम्ही बसलो; आणि नंतर जनतेत गेलो, पण अशी भाषा केली नाही. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना हात लावला तर देशातील जनता रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जनसंघर्ष यात्रेनिमित्त वाशिम येथील महेश भवन येथे आयोजित सभेत दिला.
अशोक चव्हाण म्हणाले, असे धमक्या देणारे सरकार आपल्याला राज्यात आणि केंद्रात पुन्हा निवडून द्यायचे काय? याचा विचार करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. कारण देशातील वातावरण आपण जानतच आहात. हे सरकार पुन्हा पाच वर्षांसाठी निवडून दिल्यास पुन्हा निवडणुकाच होणार नाहीत. या देशात लोकशाही जिवंत राहणार नाही तर हुकूमशाही येईल. ११ डिसेंबर रोजी पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल हाती येणार आहेत. त्यानंतर कदाचीत राज्यात आणि देशात लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका होतील. १५ फेब्रुवारीला आचारसंहिताही लागेल. विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही निवडणुकांसाठी आम्ही सज्ज आहोत.