उदयनराजे जनतेला म्हणतात, हमे तुमसे प्यार कितना….
एका संस्थेने केलेल्या या संशोधनात गर्भनिरोधक गोळ्या खाणाऱ्या महिलांना समाविष्ठ करून घेण्यात आले होते. महिलांना भीती आणि आनंद अशा भावनांच्या ऐवजी गर्व आणि अपमानाच्या भावनांना ओळखण्याचे आव्हान देण्यात आले होते. अशा महिलांमध्ये अभ्यासकांना भावनात्मक बदल झाल्याचे लक्षात आले आहे.
गोळ्या वापरणाऱ्या महिलांमध्ये गोळ्या न वापरणाऱ्या महिलांच्या तुलनेत १० टक्के वाईट प्रभाव दिसला आहे. अभ्यासकांच्या म्हणण्या नुसार गर्भनिरोधक गोळ्यांच्या परिणामावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. कारण याचा प्रभाव लैंगिक जीवनावर आणि सामाजिकतेवर पडू शकतो.
संशोधकांनी सांगितले, कि या गोळ्या हार्मोन्सशी संबंधित पिंपल्स, मासिक पाळी किंवा एडोमेट्रिओसिसला नियंत्रित करण्यास फायदेशीर ठरू शकते. तसेच गर्भनिरोधक गोळ्यांमुळे पचनक्रियेच्या कोलन कॅन्सरचा धोका हि कमी असतो.