COVID-19 in India : 70 दिवसानंतर कोरोनाच्या सर्वात कमी केस, 24 तासात आली 84 हजार प्रकरणे; 4002 जणांचा मृत्यू
नवी दिल्ली : वृत्त संस्था – मागील 24 तासात देशात कोरोना संसर्गा (Corona Infection) ची 84 हजार 332 नवीन प्रकरणे समोर आली आहेत, तर 4002 रूग्णांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे देशात 74 दिवसानंतर कोरोना संसर्गा (Corona Infection) ची इतकी कमी प्रकरणे एका दिवसा आली. कोरोनाची नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर आतापर्यंत देशात एकुण संक्रमित रूग्णांची संख्या 2 कोटी 93 लाख 59 हजार 155 झाली आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
आरोग्य मंत्रालयानुसार, देशात आतापर्यंत कोरोनाच्या 10 लाख 80 हजार 690 अॅक्टिव्ह केस आहेत, तर 2 कोटी 79 लाख 11 हजार 384 लोक बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत 3 लाख 67 हजार 81 लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनापासून मोठा दिलासा मिळत असल्याचे दिसत आहे.
–
महाराष्ट्रात कोरोनाची 11,766 नवीन प्रकरणे
महाराष्ट्रात शुक्रवारी कोविड-19 ची 11,766 नवीन प्रकरणे समोर आली तर 2213 लोकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागानुसार, नवीन प्रकरणांमुळे संक्रमितांची एकुण संख्या वाढून 58,87,853 आणि मृतांची संख्या 1,06,367 झाली आहे. राज्य सरकारने प्रयोगशाळेत कोविड-19 तपासणी आणि इतर आकड्यांची तपासणी केल्यानंतर मृतांच्या संख्येत ही वाढ केली आहे. मात्र, मागील 24 तासात कोविड-19 च्या 406 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
राजधानी दिल्ली
– नवी प्रकरणे 238
– मृत्यू 24
उत्तर प्रदेश
– नवीन प्रकरणे 619
– मृत्यू 74
सर्वात चांगली लस कोणती Covishield, Covaxin की Sputnik-V? जाणून घ्या एम्स संचालकांनी काय म्हटले
IAS संजीव जयस्वाल यांचा लेटर बॉम्ब, केला ‘गोल्डन गँग’ बाबत गौप्यस्फोट !