Coronavirus : राजस्थानमधील रहिवाशाचा ‘कोरोना’मुळं कुवेतमध्ये मृत्यू, मयताच्या कपडयांवर कुटुंबियांनी केले अंत्यसंस्कार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानमध्ये चालू असलेल्या कोरोना लॉकडाऊन दरम्यान गावामध्ये बर्‍याच कुटुंबातील लोक असे आहेत जे दुसर्‍या राज्यात अडकले आहेत. त्याचबरोबर बरेच लोक कोरोनाला बळी पडले आहेत. यातील अनेक लोकांनी आपला जीवही गमावला आहे.

काही लोकांच्या नातेवाईकांना त्यांचे शेवटचे संस्कार करण्यास देखील मिळाले नाही. अशा परिस्थितीमध्ये एक बातमी समोर आली आहे. हॉटेल व्यवसायिक दिलीप कलाल या कोरोना पेशंटचा कुवैत येथे मृत्यू झाला. गेल्या 15 दिवसांपासून त्याला कोरोनाचा झाल्यामुळे तो रुग्णालयात दाखल होता.

मृताची पत्नी, मुलगा-सून यांच्यासह हे कुटुंब डूंगरपूरच्या सीमलवाडा शहरात राहतात. कोरोना संसर्गामुळे कुणीही मृत व्यक्ती किंवा कुटूंबियांना भेटू शकत नाही. यामुळे मृतांच्या कपड्यांचे कुटुंबीयांना अंत्यसंस्कार करावे लागले.

राज्यात संक्रमणाचे अनियंत्रित प्रकरण
राज्यात सर्वाधिक संसर्ग जयपूरमध्ये आहेत. येथे 896 लोक संसर्गित आहेत. जोधपूरमध्ये 591, कोटामध्ये 194, अजमेरमध्ये 150, टोंकमध्ये 144, भरतपूरमध्ये 111, नागौरमध्ये 118, बांसवारामध्ये 64, जैसलमेरमध्ये 49, झुंझुनूमध्ये 42, झालावाडमध्ये 40, बीकानेरमध्ये, 37, भिलवारा येथे 37 रुग्ण आढळले आहेत.

याशिवाय दौसामध्ये 21, चूरूमध्ये 14, हनुमानगडमध्ये 11, सवाईमाधोपुरात 8, चित्तौडगढमध्ये 19, अलवरमध्ये 8, डूंगरपूरमध्ये 6, सिकरमध्ये 6, उदयपुरात 8, धौलपूरमध्ये 12, करौलीमध्ये 3, पालीमध्ये 12, बाडमेर आणि प्रतापगडमध्ये 2-2 आणि राजसमंदात 1 जण संसर्गित असल्याचे आढळले आहे.

रुग्णांच्या मृत्यूमध्ये वेगवान वाढ
राजस्थानमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 57 जणांचा मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक मृत्यू जयपूरमध्ये झाले आहे. येथे 34 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर जोधपूरमध्ये 7, कोटामध्ये 6, भिलवाडा, सीकर आणि भरतपूरमध्ये 2-2, अलवर, बिकानेर, नागौर आणि टोंकमध्ये प्रत्येकी एक जण मरण पावला आहे.

कोरोनाचा कहर दरम्यान दिलासादायक बातमी
एकीकडे राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे आणि दुसरीकडे दिलासादायक बातमी समोर आली आहे. आतापर्यंत संक्रमित झालेल्यांपैकी 592 रुग्ण बरे झाले आहेत. जयपूरमधील 249 लोक बरे झाले आहे.

जोधपूर 81, बीकानेर 36, भिलवाडा 2, जैसलमेर 30, बनसवारा 31, झुंझुनू 33, टोंक 35, झालावाड व चुरू 12-12, नागौर -12 , कोटा 5, डूंगरपूर 5 रूग्ण बरे झाले आहेत. याखेरीज दौसामधील 5, भरतपुरात 4-4, हनुमानगड, सीकर, पाली आणि प्रतापगड येथे प्रत्येकी दोन, बाडमेर अलवर आणि करौली येथे प्रत्येकी एक रुग्ण घरी बरा झाला आहे.