‘कोरोना’वर मात करण्यासाठी सापडला खुपच ‘खास’ घरगुती ‘उपाय’, संशोधकांनीही केलं मान्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक देशांचे शास्त्रज्ञ कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी आणि त्याच्यावर उपचार करण्यासाठी संशोधन करत आहेत. एकिकडे कोरोनाच्या लसीबद्दल सकारात्मक परिणाम येत आहेत. तर दुसरीकडे बऱ्याच कंपन्या त्यांचे औषध तयार करण्यात गुंतलेल्या आहेत.

सध्या कोरोना विषाणूची लक्षणे आढळून आल्यानंतर आधीपासूनच उपलब्ध औषधांद्वारे उपचार केला जात आहे आणि रुग्ण बरे होत आहेत तसेच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून वेळोवेळी सल्ला आणि सूचना दिल्या जात आहेत. तर आयुष्य मंत्रालयाने आयुर्वेदात कोरोना विषाणूपासून बचाव आणि गृहपचार हा देखील एक उपचार सांगितला आहे.
कोरोना टाळण्यासाठी लोकं विविध प्रकारचे घरगुती उपचारांचा अवलंब करत आहेत. मीठाच्या पाण्याने गुळणी (गार्गलिंग) करणे यापैकी एक आहे. यूकेमधील संशोधकांनीही नुकत्याच झालेल्या एका संशोधन अभ्यासात याला मान्यता दिली आहे. यूके विद्यापीठाच्या एडिनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी गुळण्या विषयावर संशोधन अभ्यास केला. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, मीठाच्या पाण्याने गुळण्या केल्यास कोरोना संसर्गाची लक्षणे बऱ्याच प्रमाणात कमी होऊन शकतात. सोबतच कोरोनाचा संसर्ग कालावधी देखील या औषधाने कमी केला जाऊ शकतो.

संशोधकांनी कोरोनाची लागण झालेल्या 66 रुग्णांवर याचा अभ्यास केला आहे. संशोधकांनी हा अभ्यास केवळ 12 दिवस चालवला. या 66 रुग्णांना कोमट पाण्यात मीठ मिसळून गुळण्या करण्यास सांगण्यात आले. 12 दिवसानंतर जेव्हा या रुग्णांच्या नाकातून नमुने घेण्यात आले, तेव्हा संसर्गाची लक्षणे फारच कमी होती.

जर्नल ऑफ ग्लोबल हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनानुसार, मिठाच्या गुळण्या केल्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांना सरासरी अडीच दिवसांत कमी संक्रमण असल्याचे आढळले. संशोधकांनी असा दावा केला आहे की, मिठाच्या गुळण्या केल्याने कोरोना विषाणूच्या संसर्गाचा परिणाम कमी होतो. तसेच गुळण्याच्या मदतीने रुग्ण कमी कालावधीत बरा होऊ शकतो.

गुळण्याच्या मदतीने कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका कमी केला जाऊ शकतो. जर माऊथवॉश/गार्गल नियमित अंतराने केले तर यामुळे कोरोना विषाणूची तीव्रता कमी होऊ शकते, असे यापूर्वी भारतीय वैज्ञानिकाने स्पष्ट केले आहे. अलीकडेच आयुष मंत्रालयानेही लोकांना गरम पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे. आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सकाळी आणि संध्याकाळी कोमट पाण्याने गुळण्या केल्या तर घसा स्वच्छ राहतो आणि त्याचवेळी संसर्गाचा धोका टाळता येतो.