मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून देशात देखील कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात कोरोना व्हारसचे 20 रुग्ण आढळून आले असून शासनाने सर्व सार्वजनिक, धार्मिक, शासकिय कार्यक्रम रद्द केले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं गुढीपाडवा मेळावा रद्द करण्याची घोषणा केली आहे.
‘कोरोना’चं सावट गडद आहे त्यामुळे ह्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘गुढीपाडवा मेळावा’ रद्द करत आहोत.
तसंच येत्या काही आठवड्यात महापालिकांच्या निवडणूका होणार आहेत पण एकूण परिस्थिती पाहता सरकारने ह्या निवडणुका किमान सहा महिन्यांसाठी पुढे ढकलाव्यात. pic.twitter.com/DWbkrjLBTQ— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 14, 2020
मनसेनं आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून गुढीपाडवा मेळावा रद्द करत असल्याची घोषणा केली आहे. कोरोनाचं सावट गडद आहे. त्यामुळे ह्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळवा रद्द करत आहोत, असे मनसेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच येत्या काही आठवड्यात महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. पण, एकूण परिस्थिती पाहता सरकारने या निवडणूका किमान सहा महिन्यांसाठी पुढे ढकलाव्यात, अशी मागणी देखील मनसेने केली आहे.
दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, अशी सूचना राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. त्यामुळे मनसेकडून औरंगाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती तिथीनुसार साजरी करण्यात येणार असल्याचे घोषीत करण्यात आले होते. परंतु कोरोना व्हायरसमुळे मनसेच्या कार्यक्रमला परवानगी नाकारण्यात आली होती.