‘कोरोना’वरील लस बनविण्यासाठी देशातील 30 ग्रुप कार्यरत, हे अतिशय जोखमीचं काम : केंद्र सरकार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूविरूद्धच्या युद्धात भारताने मोठे यश संपादन केले आहे. देशात तीन प्रकारच्या चाचण्या विकसित झाल्या आहेत, तर चौथी देखील तयार होण्याच्या मार्गावर आहे. एक चाचणी आयआयटी दिल्लीने विकसित केली होती तर एक चित्रा संस्थेने विकसित केली आहे. याची माहिती गुरुवारी सरकारकडून पत्रकार परिषदेत देण्यात आली.
भारत सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्रोफेसर के विजय राघवन म्हणाले की, देशात असे 30 ग्रुप आहेत जे कोरोनाची लस बनविण्याचा प्रयत्न करत आहेत. ही एक धोकादायक प्रक्रिया आहे. जगातील बरेच लोक लस विकसित करण्याचा दावा करत आहेत पण कोणाची लस प्रभावी ठरेल याची माहिती कोणालाही नाही. जर लस वाया गेली तर मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होते.
There are about a total of 30 groups in India, big industry to individual academics, who are trying got develop vaccines, of around 20 are keeping a good pace: Principal Scientific Advisor (PSA) to the Government of India Prof K. Vijay Raghavan pic.twitter.com/gWQOS4kCPY
— ANI (@ANI) May 28, 2020
ते म्हणाले की आम्ही सर्वसामान्य लोकांना लस देतो, आजारी किंवा शेवटच्या टप्प्यातील रूग्णाला नव्हे, कारण लसीची गुणवत्ता व सुरक्षितता याची कसून तपासणी होणे आवश्यक असते. ते म्हणाले की ही लस 10-15 वर्षात बनविली जाते आणि त्यासाठी सुमारे 200 मिलियन डॉलर्सचा खर्च होतो. ही लस वर्षभरात बनविण्यात यावी असा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे एकाच लसीवर काम करण्याऐवजी आम्ही एकाच वेळी 100 हून अधिक लसींवर काम करत आहोत.
के विजय राघवन म्हणाले की लस बनवण्याचे तीन मार्ग आहेत. एक म्हणजे आम्ही स्वतः प्रयत्न करीत आहोत. दुसरे म्हणजे आम्ही बाहेरील कंपन्यांसह मिळून काम करीत आहोत आणि तिसरे म्हणजे आम्ही नेतृत्व करीत आहोत आणि बाहेरील लोक आमच्याबरोबर काम करत आहेत. आरटी-पीसीआर चाचणी आता झाली आहे. ही अनुवांशिक सामग्रीची चाचणी आहे. दुसर्या मार्गाने देखील चाचणी होऊ शकेल जी अद्याप उपलब्ध नाही. औषध तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांचे हॅकॅथॉन केले जात आहेत. जेणेकरून यामध्ये लवकर औषध तयार करण्याची स्पर्धा लागेल. यानंतर आयसीएमआर याची चौकशी करेल.
‘विज्ञान आणि तंत्रज्ञानाने जिंकणार लढाई’
कोरोना विषाणूवरील पत्रकार परिषदेत नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल म्हणाले की कोरोना विषाणूविरोधात जी जगाची लढाई आहे, त्यातील शेवटची लढाई विज्ञान आणि तंत्रज्ञानाद्वारे जिंकली जाईल. ही लढाई लसीद्वारे जिंकली जाईल. तसेच ते म्हणाले की या लढाईत विज्ञान आणि तंत्रज्ञान ही शेवटची सीमा आहे. आपल्या देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञान आधार मजबूत आहे. मर्यादित स्त्रोत असूनही आपण आपला पाया खूप मजबूत केला आहे. ते म्हणाले की, देशातील फार्मा उद्योगास फार्मसी ऑफ द वर्ल्ड म्हटले जाते. आपल्या देशात बनवलेल्या अनेक लसी औषधे जगभर पुरवल्या जातात आणि लोकांचा जीव वाचवतात.