Coronavirus : ‘करोना’च्या पार्श्वभुमीवर मुंबई पोलिसांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून मुंबईत देखील रूग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी मुंबई पोलिसांनी आजपासून मुंबईत जमावबंदी आदेश लागू केले आहेत. गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग होत असल्याने नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी म्हणून पोलिसांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
To prevent spread of #COVIDー19, Mumbai Police has issued order prohibiting any tour involving group of people travelling together to a foreign/domestic destination organised by pvt tour operators or otherwise using powers u/s 144 CrPC. Order shall remain in force till 31st March pic.twitter.com/1FeO5ZwIHG
— ANI (@ANI) March 15, 2020
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी मुंबई दर्शन सारखे व्यावसायिक पर्यटन 31 मार्चपर्यंत बंद करण्याचे आदेश दिले आहेत. पाच पेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमू नये, असं मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलं. जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास 144 (जमावबंदी कायद्यानुसार) कारवाई करण्याचा इशाराही मुंबई पोलिसांनी दिला आहे. तसेच मोठे समारंभ, गर्दी आणि अनावश्यक प्रवास टाळावा, असं आव्हान देखील मुंबई पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
मुंबईत कोरोनाचे पाच रुग्ण आढळल्याने राज्यसरकारने मुंबईतील सिनेमागृहे, नाट्यगृहे, जिम आणि जलतरण तलाव बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कोणत्याही राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी न देण्याचा आणि ज्यांना यापूर्वी परवानगी दिली आहे, त्यांची परवानगी रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तसेच मॉल आणि गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आणि विनाकारण प्रवास करण टाळण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांची संख्या रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी जमावबंदी लागू केली आहे.