नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशात कोरोनाबाधितांचा आकडा हजाराच्या वर गेला आहे. तर मृतांचा आकडा देखील दिवसेंदिवस वाढत आहे. असे असले तरी कोरोनासारख्या जीवघेण्या आजारावर आतापर्यंत 100 जणांनी यशस्वी मात केली आहे. सरकारनं जाहीर केलेल्या आकड्यानुसार जवळपास 1072 कोरोनाबाधित सध्या वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. यातील 1024 रुग्ण भारतीय तर 48 रुग्ण परदेशी आहेत. आतापर्यंत जवळपास 30 जणांचा मृत्यू झाला आहे.
देशामध्ये कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. महाराष्ट्रामध्ये 193 कोरोनाबाधित आहेत. तर 25 जणांवरील उपचार यशस्वी ठरले आहेत. हरियाणामध्ये 33 कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी 17 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
उत्तर प्रदेशातही 75 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यातील 11 जणांवर करण्यात आलेले उपचार यशस्वी ठरले आहेत. त्यानंतर सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्ण नोयडामध्ये असल्याचे समोर आले आहे. याठिकाणी 31 जण कोरोनाबाधित सापडले आहेत. गुजरामध्ये 58 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र सूरत आणि अहमदाबादमध्ये दोन महिलांनी या आजारावर मात केली आहे.