PM मोदी 4 महिन्यांनंतर देशासमोर आले, 12 मिनिटांच्या भाषणातील 12 मोठे मुद्दे !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   आता देश हळूहळू अनलॉक (Unlock) होत आहे. सर्व काही पूर्वपदावर येत आहे. अशात काही नागरिक बेफिकिर होत कोरोनाबाबतच्या (Corona) खबरदारीकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशाला संबोधित करत महत्त्वाचं आवाहन केलं आहे.

लॉकडाऊन (Lockdown) संपला तरी कोरोना व्हायरस संपलेला नाही. अनेक लोकांनी कोरोना संपला आहे असं समजून काळजी घेणं सोडलं आहे किंवा कमी झालं आहे. परंतु जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत काळजी घ्यावी लागणार असं आवाहन पीएम मोदींनी केलं आहे.

मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे –

1) देशात रिकव्हरी रेट (Recovery Rate) चांगला आहे.

2) इतर देशांच्या तुलनेत देशवासीयांचे प्राण वाचवण्यात आपण अधिक प्रमाणात यशस्वी ठरलो.

3) लॉकडाऊन संपला आहे व्हायरस नाही.

4) व्हायरस (Virus) वाढू नये यासाठी खबरदारी घ्यावी लागेल.

5) बेफिकिर होण्याची ही वेळ नाही

6) कोरोना गेला असं समजू नका, कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे.

7) ही वेळ निष्काळजीपणाची नाही.

8) बेजबाबदार लोक कुटुंबालाही धोक्यात टाकतात.

9) भारतात (India) कोरोनाच्या अनेक लसींवर काम सुरू.

10) प्रत्येक भारतीयाच्या प्रयत्नामुळं कित्येक महिन्यांनंतर भारतात साथ आटोक्यात येत आहे.

11) कोरोना विरोधात लस येत नाही तोवर लढा सुरू ठेवावा लागणार आहे.

12) लस विकसित (Corona Vaccine) करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू.