Coronavirus : 24 तासांत 905 नवीन रूग्ण तर 51 जणांचा मृत्यू, देशातील ‘कोरोना’बाधितांची संख्या 9352 पार
नवी दिल्ली, : देशात कोरोना व्हायरसच्या प्रकरणांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या 24 तासात कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या 905 घटनांची नोंद असून 51 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या 9,352 वर पोहोचली असून त्यापैकी 324 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 857 लोक बरे झाले आहेत.
905 new positive cases and 51 deaths reported in the last 24 hours as India's total number of #Coronavirus positive cases rises to 9352, death toll stands at 324. https://t.co/3bApqH35nd
— ANI (@ANI) April 13, 2020
देशात पुरेसा साठा, काळजी करण्याची गरज नाही
आयसीएमआरच्या वतीने रमन आर. गंगाखेडकर म्हणाले की, कोरोना विषाणूच्या संसर्गाबद्दल आतापर्यंत दोन लाखांहून अधिक तपासण्या करण्यात आल्या असून, पुढील दोन आठवड्यांपर्यंत तपासणी सुरू ठेवण्यासाठी आमच्याकडे पुरेसा साठा आहे. रविवारपर्यंत देशात 2,06,212 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. आज आपण ज्या वेगवान चाचणी घेत आहोत, आमच्याकडे पुरेसा साठा आहे ज्याच्या मदतीने आम्ही पुढील सहा आठवड्यांसाठी सहज चाचणी घेऊ शकतो, म्हणून काळजी करण्याची गरज नाही.
14 दिवसांपासून अनेक जिल्ह्यात कोणतेही प्रकरण नाही
आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 857 लोक बरे झाले आहेत. एका दिवसात 141 लोक बरे झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार काही जिल्ह्यांमध्ये नियंत्रणात आला असून, गेल्या 14 दिवसांत या भागात संक्रमणाची कोणतीही नवीन प्रकरणे समोर आली नाहीत.
सरकारकडून सांगण्यात आले की, कोविड -19 वरील कोर स्ट्रॅटेजी ग्रुप आण्विक देखरेख, वेगवान आणि स्वस्त निदान (स्क्रीनिंग प्रक्रिया), नवीन औषधे यावर काम करत आहे.