Coronavirus Lockdown : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर आता फक्त 5 रूपयांत ‘शिवभोजन’

पोलिसनामा ऑनलाइन  –  देशभरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस देशलॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.त्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्यातील गोरगरीब,कामगार,शेतकरी,विद्यार्थी उपाशी राहू नये यासाठी शिवभोजन थाळीचा तालुका पातळीवर प्रकल्प विस्तार करण्यात येत आहे. राज्यात प्रत्येक तालुक्यात दररोज सकाळी ११ ते ३ या वेळेत १ लाख शिवभोजन थाळीचे वितरण करण्याचा निर्णय अन्न व पुरवठा विभागाच्या वतीने घेतला आहे.
याबाबत राज्याचे अन्न,पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी माहिती दिली.सरकारच्या या निर्णयामुळे गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे गोरगरीब,कामगार,शेतकरी,विद्यार्थी उपाशी राहू नये यासाठी शिवभोजन थाळी राज्य सरकारकडून केवळ पाच रुपयांत देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक जिल्हाच्या ठिकाणी असलेल्या शिवभोजन थाळीचा विस्तार करून तालुका पातळीवर देखील त्या चालू करून त्यांच्या संख्येत पाच पटीने वाढ करण्यात येणार आहे. यासाठी शहर भागातील प्रति थाळीसाठी ४५ रुपये तर ग्रामीण भागातील प्रति थाळीसाठी ३५ रुपये सरकार देणार असून, त्यासाठी १६० कोटींची तरतूद देखील करण्यात आली आहे.राज्यात लॉक डाऊन असल्याने नागरिकांच्या हाताला काम नाही त्यामुळे कोणावरही उपासमारीची वेळ येऊ नये तसेच रस्त्यावरील बेघर,स्थलांतरित,बाहेरगावचे विद्यार्थी उपाशी राहणार नाही यासाठी पाच रुपये या सवलतीच्या दराने जून पर्यंत ही योजना कार्यान्वित असेल.

शिवभोजन थाळी चालकांनी भोजनालय दररोज निर्जंतुकीकरण करून ग्राहकांना हात धुण्यासाठी साबणाची सुविधा करावी तसेच भोजन चालकांनी ग्राहकांना शक्यतो पॅकिंग स्वरूपात भोजन उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आले. स्वयंपाक करणाऱ्या कामगारांनी कमीत कमी वीस सेकंद हात साबणाने स्वच्छ करणे आणि सर्व भांडी निर्जंतुकीकरण करून घेणे तसेच भोजनालयातील सर्व कर्मचारी वर्गाने मास्कचा वापर करणे त्याचबरोबर चालकाने प्रत्येक ग्राहकांमध्ये कमीत कमीत तीन फूट अंतर राहील याची दक्षता घ्यावी अशी सूचना करण्यात आल्या आहे.

ग्राहकांच्या जीवनावश्यक वस्तूंच्या समस्येबाबत २४/७ मदत कार्य.

वाढीव दराने बाजारात वस्तूंची विक्री,रेशन साहित्य न मिळण्याबाबत,तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या सुरळीत न होणाऱ्या पुरवठ्याबाबत तक्रारींचे निरसन मंत्री कार्यालयात केले जात आहे. नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठाबाबत तसेच इतर कोणत्याही स्वरूपाच्या तक्रारीसाठी

संतोषसिंग परदेशी – खाजगी सचिव – ९८७०३३६५६०
अनिल सोनवणे – विशेष कार्य अधिकारी – ९७६६१५८१११
महेंद्र पवार – विशेष कार्य अधिकारी – ७५८८०५२००३
महेश पैठणकर – स्वीय सहाय्यक – ७८७५२८०९६५

या क्रमांकावरती संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.