Coronavirus | दिलासादायक ! राज्यातील ‘या’ 15 शहरात एकाही कोरोना रुग्णांचा मृत्यू नाही, आरोग्य विभागाची माहिती
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) हळूहळू ओसरत असतानाच आता एक आनंदाची बातमी आहे. रविवारी (दि. 20) राज्यातील 15 शहरात कोरोनामुळे एकही मृत्यूची (COVID-19 fatality) नोंद नाही. मात्र दुसरीकडे राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढलेला दिसत आहे. रविवारी राज्यात 9361 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. शनिवारी ही संख्या 8 हजार 912 इतकी होती. त्यामुळे गेल्या 24 तासात राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसत आहे. रविवारी राज्यात 9101 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 57,19,457 कोरोना बाधित (Coronavirus) रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.76 टक्के एवढे झाले आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
रविवारी मुंबई विभाग, ठाणे, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर, मीरा भाईंदर, पालघर जिल्हा, वसई विरार आणि रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.
तसेच नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्हा, जळगाव शहर, सोलापूर, हिंगोली जिल्हा, परभणी, लातूर, नांदेड जिल्हा
आणि शहर, अकोला, सोलापूर, अमरावती, यवतमाळ जिल्हा, वाशिम जिल्हा, नागपूर, भंडारा
आणि गोंदिया जिल्ह्यात गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्हा आणि शहर या शहरांमध्येही कोणत्याही नवीन मृत्यूची नोंद झाली नाही.
औरंगाबाद विभागातील परभणी शहर, नाशिक विभागातील मालेगाव आणि धुळे शहरात काल प्रत्येकी एक- एक कोरोना रुग्णांची नोंद झाली.
भिवंडी-निजामपूर शहरात दिवसभरात 5, जळगाव शहरात 3 आणि चंद्रपूर शहरात 6 नवीन रुग्ण आढळल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Web Titel : Coronavirus good news for maharashtra sunday 15 cities report zero covid 19 deaths
Rajgad Police Station । खेड-शिवापूर येथे पोलिसांनी पकडला 39 लाखांचा गुटखा