Coronavirus in India | ‘कठोर पावले उचला, तरच तिसरी लाट…’, महाराष्ट्रासह 8 राज्यांना केंद्राचा अलर्ट
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना रुग्णांची (Coronavirus in India) संख्या वाढल्याने केंद्र सरकारने राज्यांना सतर्क केले आहे. केंद्र सरकारने (Central Government) महाराष्ट्रासह (Maharashtra) 8 राज्यांना विशेष सूचना जारी (Special Notice Issued) केल्या आहेत. राज्यांनी आपापल्या परीने कोरोना विरोधात कठोर पावले उचलण्या यावेत जेणे करुन कोरोनाची तीसरी लाट (Third Wave) घातक होण्यापासून रोखता येईल. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण (Union Health Secretary Rajesh Bhushan) यांना दिल्ली (Delhi), हरयाणा (Haryana), तामिळनाडू (Tamil Nadu), पश्चिम बंगाल (West Bengal), महाराष्ट्र, गुजरात (Gujarat), कर्नाटक (Karnataka) आणि झारखंडला (Jharkhand) आज पत्र लिहिले आहे.(Coronavirus in India)
आरोग्य सचिवांनी या आठ राज्यांना कोरोनाविरोधात (Coronavirus in India) कठोर पावले उचलण्यास सांगितले आहे. तसेच कोरोना चाचणी (Corona Test) आणि लसीकरणाचा (Vaccination) वेग वाढवण्याचा सल्ला पत्रातून दिला आहे. देशात आतापर्यंत ओमिक्रॉन व्हेरिएंटचे (Omicron Variant) 961 रुग्ण आढळले आहेत. देशात 29 डिसेंबरला कोरोना रुग्णांमध्ये 44 टक्क्यांनी वाढ झाली आहे ही वाढ ओमिक्रॉनमुळे झाल्याचे सांगितले जात आहे.
केंद्रीय आरोग्य विभागाने आज सकाळी आकडेवारी जाहीर केली.
कोरोनामुळे बिघडत चाललेली परिस्थिती पाहता महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरयाणा, गुजरात,
मध्य प्रदेश आणि कर्नाटकमध्ये रात्रीचा कर्फ्यू (Night Curfew) जाहीर करण्यात आला आहे.
तसेच या 7 राज्यांमध्ये कोविड प्रोटोकॉलही लागू करण्यात आला आहे.
Web Title :- Coronavirus in India | central government writes to 8 states including maharashtra uts for preventive measures amid covid surge
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update