Coronavirus : महाराष्ट्रात रूग्णांचा आकडा 400 च्या पुढं, BMC नं ‘कोरोना’शी लढण्यासाठी मुंबईत 212 ठिकाणी बनवले ‘कंटेनमेंट झोन’
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोना विषाणूचा महाराष्ट्रात वेगाने वाढणारा संसर्ग लक्षात घेता प्रशासन आपल्या परीने शक्य तेवढे प्रयत्न या विषाणूला थांबविण्यासाठी करत आहे. महाराष्ट्रात मुंबईला वाचवण्यासाठी महापालिकेने सर्व शक्ती पणाला लावली आहे. बीएमसीने कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आलेल्या आणि धोका जास्त असलेल्या सर्व ठिकाणांना सीलबंद केले आहे.
राज्यात आज कोरोना बाधित 81 नवीन रुग्णांची नोंद झाली.यातील 57 रुग्ण मुंबई,6 पुणे,3 पिंपरी चिंचवड,9 अहमदनगर,5 ठाणे,1 बुलढाणा रुग्णाचा समावेश आहे.यामुळे राज्यातील एकुण बाधित रुग्णांची संख्या 416 झाली आहे.आतापर्यंत 42 रुग्णांना डिस्चार्ज करण्यात आले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 2, 2020
परंतु आता महापालिकेने आणखी एक पाऊल उचलले आहे. बीएमसीने शहरभरातील 212 कंटेनमेंट झोन अर्थात बचाव करण्याजोगे भाग शोधून काढले आहेत, जेथे खबरदारी घेण्याची जास्त आवश्यकता आहे. हे तेच क्षेत्र आहे जिथे जास्तीत जास्त लोक कोरोना विषाणूग्रस्त रूग्णाच्या संपर्कात आले आहेत आणि जे हाय रिस्क वर आहेत, तसेच होम क्वारंटाईन मध्ये ज्यांना राहण्यास सांगितले गेले आहे. बीएमसीनेही या भागांसाठी अनेक नियम बनवले आहेत.
या नियमांनुसार या भागातील लोक बाहेर जाऊ शकत नाहीत किंवा बाहेरील कोणीही या भागात प्रवेश करू शकत नाही. यासह या कंटेनमेंट झोनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले आहेत जेणेकरून या भागांवर बारकाईने नजर ठेवता येईल. या सीसीटीव्हीद्वारे हे निश्चित केले गेले आहे की लोक सर्व नियमांचे योग्य प्रकारे पालन करीत आहेत की नाही आणि बीएमसीसह मुंबई पोलिस त्यावर सतत देखरेख ठेवतात. तसेच आपत्ती नियंत्रण युनिट या सीसीटीव्ही कॅमेर्याच्या फीडवर नजर ठेवेल अशा प्रकारे कोरोनाशी लढण्यासाठी बीएमसीने एक वॉर रूम तयार केला आहे.
बीएमसीने देखील नकाशाद्वारे मुंबईकरांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि या भागांना चिन्हांकित केले आहे जेणेकरुन इतर लोकांनी अनावश्यकपणे या भागास भेट देऊ नये. तसेच या भागात राहणाऱ्या लोकांच्या गरजादेखील सांगितल्या जातात आणि आवश्यक वस्तू त्यांच्या घरी पोचवल्या जातात. एकंदरीत, बीएमसी आणि मुंबई पोलिस आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत की कमीत कमी लोकांना कोरोना विषाणूची लागण होईल आणि शहरात विषाणू शक्य तितक्या कमी प्रमाणात पसरावा.
महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 400 पेक्षा जास्त
गुरुवारी महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 20 झाली आहे तर संक्रमित लोकांची संख्या 423 वर पोहोचली आहे. नव्या प्रकरणांपैकी 57 जण मुंबईतील, पुण्यातील 9, ठाण्यातील 5 आणि 1 प्रकरण बुलढाण्यातील नोंदवण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोविड -19 मुळे होणाऱ्या नवीन मृत्यूंचा शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यात 42 लोक पूर्णपणे बरे झाले आहेत आणि त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.