Coronavirus Impact : ‘कोरोना’च्या पार्श्वभुमीवर रेल्वे बोर्डाची बैठक, 25 मार्चपर्यंत बंद होऊ शकते रेल्वे सेवा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसचा प्रसार झपाट्याने होत आहे. देशातील या व्हायरसचा धोका पाहता भारतीय रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे. 25 मार्चपर्यंत प्रवासी गाड्या किंवा गाड्यांची सेवा थांबविण्याचा विचार सुरु आहे.

ज्या ट्रेनचा प्रवास संपला आहे अशा गाड्या त्वरित टर्मिनेट केल्या जातील. सध्या 400 मालगाड्या सुरु आहेत आणि गंतव्यस्थानावर पोहोचल्यानंतर ते बंद करण्यात येतील. कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेता रेल्वे बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. अशी आशा व्यक्त केली जात आहे की याची अधिसूचना आज जाहीर होऊ शकेल.

देशात जनता कर्फ्यू
देश कोरोनाशी लढा देत आहे आणि कर्फ्यू या लढायातील महत्त्वपूर्ण शस्त्रांसारखे आहे. म्हणजे जनता स्वत: रस्त्यावर जाऊ नये. त्यामुळे सर्व सेवा निलंबित केल्या आहेत. परंतु तरीही प्रत्येक महत्वाची सेवा सुरूच आहे. उपचार चालू आहे. महत्वाच्या गोष्टी उपलब्ध आहेत. टॅक्सी बस सुरू आहेत आणि सर्व सेवा करणारे व्यक्ती आपल्या जीव धोक्यात घालून हे काम करत आहेत.