पोलीसनामा ऑनलाइन टीम – राज्य सरकारच्या कारभारावार माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली असून राज्यात अघोषित आणीबाणीसदृश्य आणि अभूतपूर्व परिस्थिती असल्याचे म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यपालांकडे एक पत्रा दिले आहे.
सोशल मीडियात सरकारविरोधात लिखाण करणार्यांची सुद्धा मुस्कटदाबी केली जात आहे. त्यांच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करण्याचे प्रकार राज्यभर सर्वत्र सुरु आहेत. दुसरीकडे वृत्तपत्र वितरण सुरक्षित असल्याचे जागतिक आरोग्य संघटना आणि तत्सम संस्थ्यांनी सांगितले असतानाही वृत्तपत्र वितरणावर बंदी टाकण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने सुद्ध राज्य सरकारला याबद्दल जाब विचारला आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
माध्यमांवरील सरकारच्या दबावतंत्राविरोधात मा. राज्यपाल भगतसिंह कोश्यारीजी यांची भेट घेतल्यानंतर त्याबाबतची माहिती दिली. pic.twitter.com/ep7KoTsS0r
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 28, 2020
एकूणच हे प्रकार निष्पक्ष माध्यमांच्या अस्तित्वावरच घाला घालणारे आहेत. लोकशाही धोक्यात आणणारे आहेत आणि म्हणून अघोषित आणीबाणीसदृश्य आहेत. या सर्व घटनांची अतिशय गंभीर दखल घेत याबद्दल राज्य सरकारला जाब विचारावा, अशी मागणी फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली. राज्यात अघोषित आणीबाणीसदृश्य आणि अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांची मुस्कटदाबी करुन त्यांच्यात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. कुणी आपल्या विरोधात बोलूच नये अशी स्थिती निर्माण केली जात आहे.