जितेंद्र आव्हाड यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर ‘निशाणा’, म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईत विशिष्ट मोहल्ल्यांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असून, लॉकडाउन पाळला जात नाही. मुंब्रा कळवा सारख्या भागात लॉकडाउन पाळला गेला पाहिजे, याबद्दल जितेंद्र आव्हाड बोलत नाही,’ असा आरोप विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावर आव्हाडांनी फडणवीसांवर टीका केली.

फडणवीसांना ज्या मोहल्ल्यांचा उल्लेख करायचा होता. त्या मोहल्ल्यांमध्ये आतापर्यंत दोनच रुग्ण सापडले आहेत. दुर्दैवाने मला माहिती नाही, देवेंद्रजींना कोणत्या व्याधीने पछाडले आहे. पण, सागर बंगल्यात बसून, धृतराष्ट्राला संजय जशा बातम्या देत होता. तसे धृतराष्ट्र बनण्याचा प्रयत्न देवेंद्रजी करत आहेत, ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे. त्यांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, जेव्हा महाराष्ट्र बंद पडला. निम्म्या डॉक्टरांनी रुग्णांना तपासण सोडून दिले होते तेव्हा शरद पवारांनी आवाहन केले की डॉक्टरांनी बाहेर पडायला पाहिजे. तेव्हा कळव्यामध्ये 12 कम्युनिटी क्लिनिक सुरू झाले. मुंब्रामध्ये एक कोरोनाग्रस्त रुग्णावर उपचार करणार एक रुग्णालय आणि क्लिनिक सुरू झाले. त्याचबरोबर अत्यंत कडक कारवाई मुंब्रा आणि कळव्यामध्ये केली जात आहे. आतापर्यंत जवळपास 400 दुचाकी जप्त केल्याचे त्यांनी सांगितले.

’आम्ही मुख्यमंत्र्यांनाच उत्तरदायी आहोत. आमचे नेते शरद पवार हे संसदीय लोकशाहीवर विश्वास ठेवतात. त्यामुळे आम्ही त्यांना बोललो की, ते आम्हाला सांगतात आधी मुख्यमंत्र्यांना सांग. आमचे सरकार भाजपासारखे नाही. सगळे अधिकार एकाच माणसाकडे हे फक्त नरेंद्र मोदीच करू शकतात. हे उद्धव ठाकरे करू शकत नाही,’ असेही आव्हाड म्हणाले.