Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 5902 नवे पॉझिटिव्ह तर 156 जणांचा मृत्यू

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन –   महाराष्ट्रात (Maharashtra) 24 तासात कोरोनाची (COVID-19)5,902 नवीन प्रकरणं समोर आली आहे. तर 7,883 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय 156 लोक कोरोनामुळं दगावले आहेत. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं (State’s Public Health Department) याबाबत माहिती दिली आहे. राज्यातील रिकव्हरी रेट आता 89.69 टक्के एवढा झाला आहे. तर मृत्यूदर हा 2.62 टक्के एवढा आहे.

राज्यात आतापर्यंत 16,66,668 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 14,94,809 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. तर 43,710 लोकांनी आपला जीव कोरोनामुळं गमावला आहे. सध्या राज्यात 1,27,603 एवढे कोरोनाचे अ‍ॅक्टीव्ह ( Active cases) रुग्ण आहेत.

आतापर्यंत झालेल्या 88,37,133 चाचण्यांपैकी 16,66,668 लोकांना (18.86 %) कोरनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. सध्या 25,33,687 लोक हे होम क्वारंटाईन आहेत. 12,690 कोरोना सेंटरमध्ये दाखल आहेत.