देशाच्या घटत्या GDP वरून राहुल गांधी यांची मोदी सरकारवर टीका, म्हणाले – ‘मोदी है तो मुमकीन है’

पोलिसनामा ऑनलाईन, नवी दिल्ली, दि. 12 – देशाची आर्थिक स्थिती खालावत आहे. या घटत्या जीडीपीवरून काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर पुन्हा एकदा टीका केलीय. ढासळत्या अर्थव्यवस्थेबाबत इन्फोसिसचे प्रमुख एन. आर. नारायण मूर्ती यांनी विधान केले. याच एका विधानाचा आधार घेऊन राहुल गांधी यांनी मोदी सरकारला टोला लगावलाय.

कोरोनामुळे देशाचा आर्थिक विकासाचा दर यंदा स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सर्वात खराब स्थितीत असेल, असे विधान इन्फोसिसचे प्रमुख नारायण मूर्ती यांनी केले होते. त्यावरून ‘मोदी है तो मुमकीन है’, असा टोला राहुल गांधी यांनी हाणला आहे.

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लावलेल्या लॉकडाऊनमुळे मागील काही महिन्यांपासून देशातील अनेक उद्योगधंद्यावर परिणाम झाला य. यामुळे उत्पादन घटले असून व्यवसाय विक्रीवर देखील मोठा परिणाम झालाय. त्यामुळे देशाच्या विकासदरात मोठी घट झालीय. त्या पार्श्वभूमीवर इन्फोसिसचे प्रमुख नारायण मूर्ती यांनी देशातील सध्याच्या आर्थिक स्थितीबाबत विधान केले होते.

कोरोनामुळे यंदा देशाचा आर्थिक विकास दर (जीडीपी)स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सर्वांत कमी राहणार आहे. अर्थव्यवस्थेला लवकर रुळावर आणणे आवश्यक आहे. तसेच देशाच्या जीडीपीमध्येही स्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठी घसरण दिसून येईल, असेही इन्फोसिसचे प्रमुख नारायण मूर्ती यांनी म्हटले होते.

देशाच्या अर्थव्यवस्थेतील प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक व्यावसायिकाला पूर्ण क्षमतेने काम करण्याची परवानगी द्यावी, अशी व्यवस्था देशात निर्माण व्हावी, अशी अपेक्षा इन्फोसिसचे प्रमुख नारायण मूर्ती यांनी व्यक्त केली.

यासंदर्भात इन्फोसिसचे प्रमुख नारायण मूर्ती यांनी नारायण मूर्ती पुढे म्हणाले, भारत देशाच्या जीडीपीमध्ये किमान 5 टक्के आकुंचन होण्याचा अंदाज आहे. 1947 नंतर देशातील सर्वात वाईट जीडीपी यंदाही दिसू शकते. जागतिक जीडीपीमध्ये घट झालीय. जगभरातील व्यापार अडचणीत आला आहे.

जागतिक प्रवासही पूर्णपणे ठप्प झालाय, अशा परिस्थितीत जागतिक जीडीपीमध्ये 5 ते 10 टक्के इतकी घट होऊ शकते, अशी भीती इन्फोसिसचे प्रमुख नारायण मूर्ती यांनी व्यक्त केलीय.