नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या भीतीमुळे शहरांमध्ये राहणाऱ्या तरुणांनी आता घराची वाट धरली आहे. नवी दिल्ली, मुंबई, पुणे या शहरांमध्ये रोजगारासाठी इतर राज्यांमधून मोठ्या प्रमाणावर तरुण आलेले आहेत. कोरोनाचं सावट आणि लॉकडाऊनची भीती यामुळे त्यांनी गावी परतण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रेल्वे स्टेशनवर गर्दी झाली असून त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची भीती निर्माण झाली आहे. हे लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराकडे जाणाऱ्या सर्वांना प्रवास न करता ज्या शहरांमध्ये आहात तिथेच थांबण्याची विनंती केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून हे आवाहन केले आहे. माझी सर्वांना प्रार्थना आहे की, तुम्ही ज्या शहरात त्याच शहरात रहा. आपण कोरोनाला रोखू शकतो. रेल्वे स्थानके, बस स्थानकांवर गर्दी करून आपण आपल्या आरोग्याशी खेळ करत आहोत. कृपया तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबीयांची काळजी करा, गरज नसेल तर घराबाहेर पडू नका असे आवाहन मोदी यांनी केले आहे.
PM:I appeal to all that in whichever city you're in,stay there for few days. By doing so,we can control spread of #Coronavirus.We're playing with our health by crowding railways stations&bus-stands.Please think about yourself&your family;don't move out of your house,unnecessarily https://t.co/1HOVsB3S3i
— ANI (@ANI) March 21, 2020
शहरांमध्ये शट डाऊन केल्याने लोकांना गावाकडे जाण्याचा पर्याय स्विकारला आहे. त्यामुळे कोरोना देशभरात पसरण्याचा धोका मोदी यांनी व्यक्त केला आहे. कोरोनाच्या भीतीमुळे अनेक जण शहरे सोडून त्यांच्या गावी परतत जात आहेत. गर्दीमध्ये प्रवास करून काय साध्य होणार आहे. उलट धोका आणखी वाढेल. तुम्ही जिथे जाताय तेथील लोकांनाही कोरनाची लागण होऊ शकते. तुम्ही गावात आणि कुटुंबाची संकटे वाढविणार आहेत, असा इशारा मोदींनी दिला आहे.
कोरोना के भय से मेरे बहुत से भाई-बहन जहां रोजी-रोटी कमाते हैं, उन शहरों को छोड़कर अपने गांवों की ओर लौट रहे हैं। भीड़भाड़ में यात्रा करने से इसके फैलने का खतरा बढ़ता है। आप जहां जा रहे हैं, वहां भी यह लोगों के लिए खतरा बनेगा। आपके गांव और परिवार की मुश्किलें भी बढ़ाएगा।
— Narendra Modi (@narendramodi) March 21, 2020