काँग्रेसचे सुरजेवालांची टीका; म्हणाले – ‘अंत्यसंस्कारासाठी रांगांच..हे फोटो मोदी सरकारला आयुष्यभर छळतील’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात कोरोनाची संख्या प्रचंड झाल्याने अनेक आरोग्याच्या सोयी कमी पडत आहे. यामुळे अनेक कोरोनाबाधित रुग्ण मृत्यू पडत आहेत. दैनंदिन मृतांचे प्रमाण अधिक असल्याने स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी अधिक काळ प्रतीक्षा करावी लागत आहे. या सर्व घटनेवरून काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. दिल्लीत अंत्यसंस्कारासाठी २० तासांची प्रतीक्षा करावी लागत असल्याचं वृत्त ट्विट करत, ‘हे मानवतेच्या विरोधात आहे. हा गुन्हा आहे. असे सुरजेवाला यांनीं म्हटलं आहे.
ये मानवता के खिलाफ है
ये अपराध भी है।
अंतिम संस्कारों का ये अन्तहीन सिलसिला अहंकारी शासकों के पत्थर दिली का सबूत है।
अपने ही लोगों की लाशों की बुनियाद पर सरकार मजबूत नहीं हो सकती।
ये तस्वीरें और घटनाएं मोदी सरकार को जीवन भर पीछा करेगी।#COVID19 #CovidIndia pic.twitter.com/4rxK8h6nth
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) April 28, 2021
काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला म्हणाले, अंत्यसंस्कारासाठी लागलेल्या या रांगा अहंकारी शासक दगडाच्या काळजाचे असल्याचा हा पुरावा आहे. आपल्याच लोकांच्या मृतदेहांचा पाया रचून सरकार मजबूत होऊ शकत नाही. या घटना आणि हे फोटो मोदी सरकारचा आयुष्यभर पिच्छा पुरवतील, असा निशाणा सुद्धा त्यांनी साधला आहे.
राहुल गांधी काय म्हणाले ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्विट करून लोकांनी एकमेकांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. या आंधळ्या यंत्रणेला सत्य दाखवलं पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे. एकमेकांना मदत करताना सामान्य लोक दिसत आहेत. यातून कोणाचं मन जिंकण्यासाठी हाताला स्पर्श करण्याची गरज नसल्याचं दिसून येतं. मदतीचा हात असाच देत राहा आणि या आंधळ्या यंत्रणेला सत्य दाखवत राहा, असं आवाहन राहुल गांधी यांनी केलं आहे.
या दरम्यान, देशात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पहिल्यांदा एका दिवसात एक लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यानंतर केवळ अडीच आठवड्यांत हा आकडा तीन लाखांच्या वर गेला आहे. मागील सहा दिवसांपासून देशात दररोज तीन लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. मृतांच्या संख्येतही दररोज वाढ होत आहे.