मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात आता झपाट्याने कोरोना रुग्णांची संख्या कमी होतांना दिसत आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 91.53 टक्क्यावर (corona-virus-recovery-rate-state-91-percent) पोहचला असून मृत्यू दर 2.63 टक्के आहे. त्यामुळे हा खूप मोठा दिलासा ठरला आहे.
राज्यात दिवसभरात 3 हजार 959 नवीन कोरोना रुग्ण आणि 150 मृत्यूंची नोंद झाली आहे. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 17 लाख 14 हजार 273 इतका झाला आहे. आतापर्यंत 15 लाख 69 हजार 90 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात 6 हजार 748 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या राज्यात 10 लाख 71 हजार 163 व्यक्ती घरगुती अलगीकरणात आहेत, तर 9 हजार 799 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत. आता राज्यात 99 हजार 151 सक्रिय रुग्ण आहेत. पुणे, मुंबई आणि ठाणे येथे अजूनही कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजारांपेक्षा अधिक आहे.