‘कोरोना’च्या माहामारीविरुद्ध लढण्यासाठी WHO चं भारताला आवाहन, तज्ज्ञ म्हणाले..

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना माहामारीत आता सहा महिन्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं भारताला आवाहन केलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ही माहामारी लवकर संपणारी नाही. त्यामुळे भारतासह अनेक देशांनी कोरोना संक्रमणाशी सामना करण्यासाठी तयारी करणं गरजेचं आहे. भारतात कोरोना संक्रमणाचा दर कमी ठेवण्यासाठी तज्ज्ञांनी आवाहन केलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या पूर्व आशियातील क्षेत्रीय प्रमुख डॉ. पूनम खेत्रपाल यांनी सांगितले की, जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पसरत आहे. कोरोनाची माहामारी लवकर आटोक्यात येईल असे वाटत नाही. अशा स्थितीत भारत सरकार आणि राज्य सरकारने कोरोनाशी सामना करण्यासाठी तयारी करायला पाहिजे. जोपर्यंत कोरोना व्हायरसची लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत सर्वच देशातील लोकांनी एकत्र येऊन या महामारीचा सामना करायला हवा, असंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे कोरोनामुळे वाढणारा मृत्यू दर कमी होण्यास मदत होईल.

डॉ. खेतपाल यांनी भारतासह दक्षिण पूर्व आशियायी देशांना सल्ला दिला आहे की, त्यांनी चाचण्या, आयसोलेशन, तपासण्या, स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंग या गोष्टींकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. उत्तम वैद्यकिय सेवा देण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. याशिवाय जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की अनेक ठिकाणी आरोग्य सेवा आधीपेक्षा चांगल्या झाल्या आहेत. स्टेस्टींगची संख्या वाढवण्यात आली आहे. रुग्णांकडे अधिक लक्ष दिले जात आहे.