धक्कादायक ! गणपतीसाठी एकत्र आलेल्या परिवारातील 30 जणांना ‘कोरोना’

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे राज्यभरात साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. सर्वांनी बाप्पाचा उस्तव साजरा करताना सर्व नियम पाळले आहेत. पण कल्याण येथे गणपतीसाठी एकत्र आलेल्या परिवारातील 30 जणांना संसर्ग झाला आहे.

कल्याण येथील जोशीबाग परिसरील एका मुलाला कोरोना झाला होता.त्यानंतर त्या मुलाच्या संपर्कात आसलेल्या 40 जणांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 30 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. कल्याण डोंबवली महानगरपालिकाच्या (केडीएमसी) अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, ठाण्यात कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 3 हजार 668 झाली आहे. महिनाभरापासून जिल्ह्यात काहीसा आटोक्यात आलेला कोरोनाचा प्रादुर्भाव गणेशोत्सवानंतर वाढू लागला आहे.