आता ‘कोरोना’विरुद्धच्या युद्धात जिंकेल भारत ! देशात 150 दिवसांत 10 लाखापेक्षा अधिक रुग्ण झाले बरे, फक्त ‘या’ 3 राज्यांमधून 53 % रिकव्हरी

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – पुर्ण जगात कोरोना व्हायरसची दहशत आहे, परंतु या दरम्यान भारतासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. बुधवारी भारतात कोरोना विषाणूमुळे बरे झालेल्या रूग्णांची संख्या 10 लाखाच्या पार गेली आहे. भारतात ज्या प्रकारे कोरोना विषाणूचा झपाट्याने प्रसार होत आहे तशा परिस्थितीत रूग्णांची रिकव्हरी होण्याची संख्या मोठी अपेक्षा आहे.

बुधवारी रात्रीपर्यंत, संपूर्ण भारतात संक्रमित 1,582,730 (64.4 टक्के) पैकी 1,019,297 लोक या आजाराने बरे झाले आहेत, तर 33,236 लोक मरण पावले आहेत. सध्या देशात कोरोना व्हायरसची 5,28,459 सक्रिय प्रकरणे (एकूण प्रकरणांपैकी 33.4 टक्के) आहे.

दिल्लीतील कोविड हॉस्पिटलशी संबंधित हॉटेल्सना केजरीवाल यांनी दिला मोठा दिलासा
रिकव्हर झालेल्या कोरोना संक्रमितांची आणि सक्रिय प्रकरणांच्या संख्या दरम्यान हा गॅप तो प्रमुख आकडा आहे, जो कोविड -19 विरुद्ध देशातील दीर्घकाळ चालणार्‍या लढाईत आशेचा किरण दर्शवते. तथापि, हा फरक नेहमी नव्हता.

देशातील कोरोनाच्या आकडेवारीकडे पाहिले तर, 2 मार्चपासून रिकव्हर होणाऱ्या रूग्णांची संख्या 10 लाखाच्या पार पोहचण्यासाठी 150 दिवसांचा कालावधी लागला. 2,50,000 लाख रिकव्हर होण्यासाठी 114 दिवस लागले होते. 12 जुलै रोजी भारताने 7,50,000 रिकव्हरी पार केली होती.

पुर्ण देशात 64.4 टक्के कोरोना रुग्ण कोविड -19 मात करून बरे झाले आहेत, जे जागतिक सरासरीच्या 61.9 पेक्षा जास्त आहे. दिल्लीत रिकव्हरीचा दर खूपच चांगला आहे. दिल्लीत सर्वाधिक 1,33,310 लोक रिकव्हर झाले आहे. त्याचबरोबर, लडाखमध्ये 80 टक्के, हरियाणामध्ये 78 टक्के, आसाममध्ये 76 टक्के, तेलंगणामध्ये कोरोनाचे 75 टक्के रुग्ण बरे झाले आहेत. ही पाच राज्ये रिकव्हरीच्या बाबतीत सर्वात मोठे प्रमाण असलेले राज्य आहेत.

एम्स ऋषिकेश देशातील पहिले रुग्णालय बनले, जेथे रुग्ण एअर लिफ्टद्वारे पोहोचतील
त्याचबरोबर महाराष्ट्रातील 400,651 प्रकरणांपैकी 2,39,755 रिकव्हर झाले आहेत. तामिळनाडूमध्ये 2,34,114 प्रकरणांपैकी 1,72,883 प्रकरणे रिकव्हर झाली आहेत. तामिळनाडू सर्वात जास्त रुग्णांना डिस्चार्ज करणारे दुसरे राज्य आहे.

अशाप्रकारे पाहिले तर देशात कोरोना विषाणूच्या 53 टक्के रुग्णांची रिकव्हरी फक्त महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्लीमध्ये झाली आहे. तथापि, हे नाकारता येणार नाही की, कोरोना विषाणूमुळे या तीन राज्यांत कोरोनाने सर्वाधिक कहर केला आहे. देशात एकूण कोरोना प्रकरणांमध्ये 48.5 टक्के भाग या तीन राज्यांचा आहेत.