पाणी टंचाईच्या निषेधार्थ विश्रांतवाडीत 7 तारखेला पालखी अडवणार : नगरसेविका रेखा टिंगरे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

कळस धानोरी भागाला अनियमित पाणी पुरवठा होत आहे.या पाणी टंचाई च्या निषेधार्थ 7 तारखेला विश्रांतवाडी येथील मुकुंदनगर आंबेडकर चौकामध्ये पालखी अडवून आंदोलन करणार आहे.असा इशारा पुणे महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका रेखा टिंगरे यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.
[amazon_link asins=’B0783HZ6LZ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2f75ac74-80ef-11e8-a4ff-b7cf0abee69a’]
या विषयी नगरसेविका रेखा टिंगरे म्हणाल्या की, होळकर पंपींग स्टेशनमधून विद्यानगर पंपिंग स्टेशन ला कमी दाबाने पाणी पुरवठा मागील कित्येक दिवसापासून केला जात आहे.त्यामुळे प्रभाग क्रमांक 1 क कळस धानोरी भागाला अनियमित पाणी पुरवठा होत आहे.यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असून पाणी पुरवठा सुरुळीत करावा.यासाठी पुणे महापालिका प्रशासनाशी अनेक वेळा पत्र व्यवहार केला.मात्र याची दखल न घेतली गेली नाही.यांच्या निषेधार्थ 7 तारखेला विश्रांतवाडी येथील मुकुंदनगर आबेंडकर चौकात पालखी अडवून आंदोलन केले जाणार आहे.असा इशारा त्यांनी यावेळी दिला.