7 वर्ष चाललं ‘अफेयर’, 4 तास मंडपात वाट पाहिली ‘वधू’नं, पोहचला नाही ‘वर’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सात वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरु असलेल्या प्रेमी जोडप्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि शेवटी लग्नाचा दिवस उजाडला. मात्र, लग्नाच्या दिवशी चार तास वाट पाहूनही नवरदेव मंडपात न आल्यामुळे मुलीने पोलीस स्टेशनकडे धाव घेतली आणि मुलाविरोधात तक्रार दाखल केली. पंजाब मधील गुरुदासपूर येथील ही घटना आहे.
पोलीस स्टेशमध्ये आलेल्या तरुणीने सांगितले की, गुरुदासपूरमध्ये राहणाऱ्या रमण कुमार नावाच्या युवकाशी गेल्या सात वर्षांपासून प्रेम संबंध होते. मोठ्या प्रयत्नानंतर दोघांनी आपल्या परिवारांना प्रेम विवाहासाठी राजी केले होते. लग्ना आधीचे सर्व कार्यक्रमही सुरळीत पार पडले होते.
परिवाराने पोलीस स्टेशनमध्ये सांगितले की, सर्व काही ठरलेले होते. मात्र, रमण लग्नाच्या दिवशी आलाच नाही. खूप वेळ वाट पाहिल्यानंतर त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही. रमण च्या घरच्यांशीही कोणाचाच संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे मुलीचे कुटुंबीय पोलीस स्टेशमध्ये पोहचले आणि त्यांनी मुलावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
इन्स्पेक्टर कुलवंत सिंह यांनी तरुणी दीपिकाने एका मुला विरोधात तक्रार दिली असल्याचे सांगितले आहे. दीपिकाने सांगितले की, रमणने लग्न करण्याचे काबुल करूनही तो लग्नाच्या दिवशी हजर न राहता गायब झाला. याबबत पोलीस अधिक तपास करित आहेत.
Visit : policenama.com
- या सामान्य समस्येमुळे कमी होते पुरूषांची यौन क्षमता, ‘हे’ आहेत १० परिणाम
- निरोगी दातांसाठी करा ‘हे’ रामबाण उपाय, कीड होईल नाहीशी
- स्वप्नदोषाची समस्या घालवण्यासाठी करा ‘हा’ उपाय, वेळीच घ्या जाणून
- ड्राय फ्रूटच्या तुलनेत लोणी जास्त दमदार, नियमित करा सेवन
- कंडोममुळेही होऊ शकते अॅलर्जी, वेळीच घ्या काळजी
- होय, बिनधास्त खा ‘शिळा भात’, आरोग्यासाठी आहे चांगले, जाणून घ्या कारणे
- सिगारेटमुळे लहान मुलांना येऊ शकतो जन्मत:च बहिरेपणा, जाणून घ्या