नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कौटूंबिक कलहाने संपूर्ण कुटूंबालाच आपला जीव गमवावा लागला. पहिल्यांदा पतीने पत्नीचा सुऱ्याने गळा कापला, त्यानंतर स्वत:च स्वत:च्या पोटात सुरा भोसकून आत्महत्या केली. ही हृदय हेलावून टाकणारी घटना दिल्लीच्या प्रल्हादपूर भागात घडली. बुधवारी घरात नवरा, बायकोचा मृतदेह मिळाल्याने परिसरात खळबळ उडाली.
दोघांच्या शरीरावर चाकूने वार केल्याचे निशाण आहे. पत्नीचा गळा चाकूने कापला होता तर पतीच्या पोटात चाकू खुपसल्याचे निशाण होते. दरवाजा आतून बंद होता. पोलिसांचा संशय आहे की पहिल्यांदा पतीने पत्नीची चाकूने हत्या केली आणि त्यानंतर स्वत: आत्महत्या केली. सांगण्यात येत आहे की या दोघांत वाद झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, दोघांचे 8 वर्षापूर्व लग्न झाले होते. त्यांना 5 वर्षांचा मुलगा देखील आहे. लग्नानंतर दोघांत सतत वाद होत होते. परंतू रोज होणाऱ्या या वादांमुळे रागाच्या भरात आकाशने हे पाऊल उचलले. आकाश आपल्या पत्नीवर संशय देखील घेत असतं आणि घरात वादाचे हेच कारण असू शकते. आता आकाशचे कुटूंबीय देखील या मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत.
सध्या पोलीस संबंधित घटनेचा तपास करत आहे आणि शोधत आहेत की अखेर आकाशने असे पाऊल का उचलले.
Visit : Policenama.com
- ‘हे’ सेवन केलंत तर डोकं चालेल जबरदस्त ! जाणून घ्या काय आहे यामध्ये –
- डोळ्यांची ‘ही’ लक्षणे ओळखली तर ‘या’ आजारांवर वेळीच करू शकता उपचार –
- डोळे आल्यास अशी घ्या काळजी, संसर्गापासून वाचण्यासाठी असे करा उपाय –
- आकर्षक फिगरसाठी करा ‘हे’ ५ घरगुती उपाय, वजन होईल कमी –
- चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
- स्मार्टफोनचा अतीवापर केलात तर लवकर होऊ शकता म्हातारे, जाणून घ्या –
- गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करा योग्य प्रमाणात, होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार –
- पिळदार शरीरासाठी ‘हे’ आवश्य खा, असा करा या पदार्थाचा वापर –