PM मोदींचा महत्वपूर्ण निर्णय ! कोव्हिड योद्ध्यांना आता सरकारी नोकरीत प्राधान्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारतात कोरोनाने कहर केला असून आरोग्याच्या सोयी पुरवण्यासाठी सरकार अधिकतेने प्रयत्न करत आहे. अधिकतर कोरोनाबाधित रुग्णांना प्राणवायूची आवश्यकता भासत आहे. यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. एक अंदाजानुसार कोरोनाच्या महामारीनंतर देखील डॉक्टर तसेच परिचारिकांच्या कमतरता निर्माण होऊ शकतात. या परिस्थितीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या संकटावरून मोदींनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची उपलब्धता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या घेतलेल्या निर्णयामध्ये NEET-PG परीक्षा कमीत कमी ४ महिने पुढे ढकलली जावी. आणि कोव्हिड ड्युटीचे १०० दिवस पूर्ण करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना नियमित सरकारी भरतीत प्राधान्य दिले जाणार असल्याची घोषणा नरेंद्र मोदींनी केली आहे. तर सोमवारी पंतप्रधान मोदी म्हणाले की, विभागाच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय विद्यार्थ्यांनी कोविडशी संबंधित कर्तव्य केले पाहिजे. कोव्हिड रुग्णांच्या सेवेत १०० दिवस काम पूर्ण करणारे वैद्यकीय कर्मचारी यांना पंतप्रधानांचा प्रतिष्ठित कोव्हिड राष्ट्रीय सेवा पुरस्कार देण्यात येईल. याद्वारे त्यांना शासकीय भरतीत प्राधान्य दिले जाईल.

पंतप्रधानांनी घेतलेले महत्वपूर्ण निर्णय –

१. वरिष्ठ डॉक्टर आणि नर्स यांच्या देखरेखीखाली पूर्णवेळ कोरोना नर्सिंगमध्ये BSc/GNM परिचारिका वापरल्या जाऊ शकतात.

२. ड्युटीवर असणार्‍या वैद्यकीय विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने लस दिली जाईल. या व्यतिरिक्त कोरोना रुग्णांच्या सेवेत असलेल्यांना आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणेच केंद्राच्या विमा योजनेत समावेश केले जाईल.

३. कोरोना राष्ट्रीय सेवा पुरस्कार देखील देण्यात येईल.

४. PG विद्यार्थ्यांच्या नवीन बॅच जोवर तयार होत नाही, तोपर्यंत अंतिम वर्षाच्या PG विद्यार्थ्यांना सेवेत वापरले जाऊ शकते.

दरम्यान, मागच्या काही दिवसात हृदयरोग सर्जन डॉ. देवी शेट्टी यांचे एक भाष्य केले होते कि, प्राणवायूच्या तुटवड्यामुळे पुढचे मोठे संकट हे डॉक्टर आणि परिचारिकांवर येणार असून, त्यांची कमतरता भासू शकते. महिन्यात कोरोना जास्त वाढणार आहे. अशा परिस्थितीत कोव्हीड रुग्णांना डॉक्टर आणि परिचारिकांची भेट घेणे कठीण होईल.