नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमुळे मार्चमध्ये सुरू होणारे आयपीएलचे १३ वे सत्र आता १९ सप्टेंबरपासून देशाबाहेर सुरू होणार आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत आयपीएल युएईमध्ये जैव-सुरक्षित वातावरणात होईल. कोरोनामुळे बीसीसीआयला आयपीएलचा हा हंगाम बाहेर आयोजित करावा लागला. तसेच आता बीसीसीआय कोरोनामुळे आयपीएल २०२१ साठी लिलावाचे आयोजन करणार नसल्याची बातमी येत आहे. एका वृत्तसंस्थेनुसार, कोविड-१९ च्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर बोर्डाने हे अनिश्चित काळासाठी स्थगित केले आहे.
केवळ चार महिने शिल्लक राहतील
आयपीएलचा १३ वा हंगाम १० नोव्हेंबरला संपेल आणि त्यानंतर आयपीएलचा पुढील हंगाम आयोजित करण्यासाठी मंडळाकडे साडेचारच महिने असतील. भागधारकांची होणारी नुकसान भरपाई करण्यासाठी बोर्ड ५० दिवसांहून अधिक दिवस आयपीएल आयोजित करणार आहे. मंडळाच्या या निर्णयाशी फ्रँचायजीही सहमत असल्याचे दिसून येत आहे. फ्रँचायजीला चांगलेच माहित आहे की, नवीन संघ तयार करण्यासाठी पुरेसा वेळ नाही.
एका सूत्रानुसार, यावेळी मेगा लिलाव करण्यात काही अर्थ नाही. जोपर्यंत योग्य वेळेत योजना आखण्यासाठी पुरेसा वेळ नाही. आयपीएल आयोजित केली जाऊ शकते आणि २०२१ हंगामानंतर या गोष्टी दिसू शकतात. आयपीएलचा लिलाव न करण्याची आणखीही अनेक कारणे आहेत.
1. आयपीएल पर्स पुन्हा तयार करणे. हे दर वर्षी सुमारे ८५ कोटी रुपये असते.
2. लिलाव यादी तयार करण्यासाठी भारतीय आणि परदेशी खेळाडूंशी संवाद साधने, यात बराच वेळ लागू शकतो.
3. लिलावासाठी फ्रेंचायजींला वेळ देणे. लिलावाची तयारी करण्यासाठी साधारणपणे फ्रँचायजीला ४ ते ६ महिने लागतात.
4. संघात नवीन खेळाडू जोडल्यानंतर ब्रँड ऍक्टिव्हिटीसाठी देखील बराच वेळ लागतो.