भूकेमुळं प्रचंड ‘हाल’, अनुष्कासह ‘गयाना’च्या गल्लीत भटकत होता विराट, जे ‘गवसलं’ ते ‘इंस्टा’वर केलं ‘पोस्ट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वेस्टइंडीझ विरुद्ध टी २० सामन्यांच्या मालिकेमध्ये क्लीन स्वीप दिल्यानंतर विराट कोहली आणि टीम इंडियाची नजर आता एकदिवसीय मालिकेकडे आहे. मात्र गुरुवारी झालेल्या पावसामुळे पहिला एकदिवसीय सामना होऊ शकला नाही. वर्ल्डकपनंतर लगेचच भारतीय टीम वेस्टइंडीजच्या दौऱ्यावर गेली होती. त्यातील टी २० मालिकेनंतर संघांचे शेड्युल खूपच व्यस्त आहे अशातसुद्धा विराट कोहली आपली पत्नी अनुष्कासाठी वेळ काढत आहे.

Virat-and-Anushka

गुरुवारी एकदिवसीय सामन्यापूर्वी विराट अनुष्का ‘गयाना’च्या रस्त्यावरून फिरत होते भारतीय जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी त्यांची धडपड सुरु होती. त्यासाठी ते एखाद्या रेस्टाॅरंट शोधात फिरत गयानाच्या गल्लोगल्ली फिरत होते. शेवटी खूप प्रयत्नानंतर त्यांना एक देसी रेस्टोरंट सापडलेच आणि या जोडीने तिथे खाण्याचा आनंद लुटला. याबाबतचा एक फोटो स्वतः विराट कोहलीने आपल्या इंस्टग्राम अकाउंट वरून टाकला आहे आणि ‘मेरी लवली के साथ शानदार खाना’ असा कॅप्शनही त्याने यावेळी दिले आहे.

क्रिकेट प्रेमी पाहताहेत कोहलीच्या शतकाची वाट

वर्ल्डकपपासून आतापर्यंत कॅप्टन कोहलीने शतक लगावले नाही, त्यामुळे सर्व चाहते विराटच्या शतकाची वाट पाहत आहेत. या आधीच्या सामन्यात विराटने ५९ धावांची चांगली खेळी केली होती मात्र या आधी विराटने वल्डकपमध्ये अर्धशतकी खेळी केली होती त्यामुळे आता क्रिकेटप्रेमी विराटच्या शतकाच्या प्रतीक्षेत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त