मुस्लीम असूनही भारतासाठी का खेळतोस ? ‘पाक’मध्ये विचारलेल्या प्रश्नाला इरफाननं दिलं ‘हे’ उत्तर, सगळ्यांकडून टाळ्यांचा ‘कडकडाट’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था : जेव्हापासून संसदेत नागरिकत्व दुरुस्ती कायदा मंजूर झाला तेव्हापासून देशभरात बर्याच ठिकाणी या कायद्यास विरोध केला जात आहे. यावेळी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईवर विविध क्षेत्रातील अनेक लोकांनी टीका केली. या लोकांमध्ये भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाणचा देखील समावेश होता, ज्याने विद्यार्थ्यांवरील हल्ल्यांचा निषेध करत ट्विट केले होते. मात्र, या ट्विटनंतर त्याला खूप ट्रोल केले गेले, त्यानंतर पुन्हा एकदा इरफान पुढे येऊन निषेध केला आणि आपण भारतीय आहोत. त्यामुळे आपल्याला देशात बोलण्याचा अधिकार आहे. यादरम्यान, इरफानने आपला पाकिस्तान दौऱ्यातील एक किस्सा सांगितला जेथे त्याच्या धर्मावर प्रश्नचिन्ह उठवण्यात आले होते.
पाकिस्तान दौर्यावर असताना इरफानला एक प्रश्न विचारण्यात आला होता
इरफान पठाण यांनी सांगितले की २००४ मध्ये ते एका मालिकेसाठी पाकिस्तानला गेले होते. यावेळी ते राहुल द्रविड, पार्थिव पटेल आणि लक्ष्मीपती बालाजी यांच्यासह लाहोरच्या एका महाविद्यालयात गेले जेथे जवळपास १५०० मुले उपस्थित होती आणि त्यांना वेगवेगळे प्रश्न करत होते.
त्या दरम्यान एका मुलीने उभे राहून इरफान पठाणला अतिशय रागावून विचारले की तो मुस्लिम आहे तर भारतासाठी का खेळतो? इरफान म्हणाला, ‘मी उभा राहून म्हणालो की मी भारताबरोबर खेळून भारतावर कृपा करीत नाही. भारत हा माझा देश आहे. माझे पूर्वज भारतातले आहेत. भारताचे प्रतिनिधित्व मी करतो त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो. माझे उत्तर ऐकून सर्वांनी महाविद्यालयात टाळ्या वाजवल्या.’
इरफान पठाण ने सांगितले की जेव्हा तो गोलंदाजी करतो तेव्हा तो हा विचार नाही करत की तो एक मुसलमान आहे, कारण तो आधी भारतीय आहे. इरफान पठाण ने सांगितले की जर तो पाकिस्तानात जाऊन आपल्या देशाबाबत अभिमानाने सांगत असेल तर आपल्याच देशात तो का बोलू शकत नाही.
Political blame game will go on forever but I and our country🇮🇳 is concerned about the students of #JamiaMilia #JamiaProtest
— Irfan Pathan (@IrfanPathan) December 15, 2019
इरफान पठाण यांनी ट्विट केले होते की, ‘राजकारणात आरोप-प्रत्यारोप चालूच राहतील पण जामिया मिलियाच्या विद्यार्थ्यांसाठी मी आणि आपला देश चिंतित आहे.’ या ट्विटनंतर त्याला प्रचंड प्रमाणात ट्रोल करण्यात आले. यावर इरफान पठाण याने तीव्र नाराजी व्यक्त करताना म्हटले की, ‘जेव्हा मी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात ट्विट केले तेव्हा मी सर्वांचा प्रिय होतो. आणि आता जेव्हा मी माझ्या विद्यार्थ्यांविषयी बोलत आहे, तेव्हा मी चुकीचा आहे, असे का?’
पैसे घेऊन ट्विट केल्याच्या प्रकरणावरून इरफान चिडला
इरफान पठाण पुढे म्हणाले, मी जेव्हा जेव्हा माझ्या मित्रांशी बोलतो तेव्हा मी कधीही धर्माबद्दल बोलत नाही. आम्ही कामाबद्दल एकमेकांच्या आयुष्याबद्दल बोलतो. कोणीही असे म्हणत नाही की मी त्याच्याशी बोलणार नाही कारण तो इतर कोणत्या तरी धर्माचा आहे. आपल्या सर्वांची इच्छा आहे की आपल्या कुटुंबाप्रमाणेच देशानेही पुढे जावे.
इरफान यांनी हे आरोप फेटाळून लावले ज्यात लोक म्हणाले की तो पैशाने ट्विट करतोय. ते म्हणाले, ‘मी कष्ट आणि सत्यातून पैसे मिळवतो. जर कोणी असे म्हणते की मी द्वेष पसरवण्यासाठी ट्विट केले आहे, तर मी आजपासून सोशल मीडिया सोडेल. लहान असताना माझ्याकडे सायकलसुद्धा नव्हती. आज या देशाने मला खूप प्रेम दिले आहे, जे नेहमीच माझ्याबरोबर राहील. मला खात्री आहे की लोक माझा मुद्दा समजतील.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- अशी मिळवा ‘किडनी स्टोन’पासून सुटका, करा ‘हे’ ५ घरगुती उपाय
- वीकेंडला झोप पूर्ण करून घ्या, अन्यथा पडू शकते महागात, वाचा ‘हे’ ३ निष्कर्ष
- रोज ओले खोबरे खाण्याचे ‘हे’ आहेत 5 फायदे !
- कारल्याचे ‘हे’ ११ फायदे वाचून नियमित खाल भाजी, जाणून घ्या
- ‘मायग्रेन’च्या डोकेदुखीने त्रस्त आहात ? ‘या’ ८ गोष्टींचे करा सेवन
- तुम्ही अशाप्रकारे झोपता का? जाणून घ्या ४ योग्य-अयोग्य पद्धती