एकेकाळी पाणीपुरी विकली, 3 वर्ष तंबूत राहिला, आता 17 वर्षाच्या ‘या’ फलंदाजानं केली ‘धुव्वाधार’ बॅटिंग
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सलामी फलंदाज यशस्वी जयसवाल याची शानदार शतकी खेळी आणि आदित्य तरे याच्या 86 धावांच्या जोरावर मुंबईने विजय हजारे ट्रॉफीमध्ये गोव्याला 130 धावांनी नामवंत शानदार विजय मिळवला. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 152धावांची भागीदारी केली.
मुंबईने निर्धारित 50 शतकांत चार विकेटच्या मोबदल्यात 362 धावांचा मोठा डोंगर उभा केला होता. त्याचा पाठलाग करताना गोव्याला केवळ 232 धावाच करता आल्या. 17 वर्षीय यशस्वी जयस्वाल याचा हा लिस्ट ए मधील दुसराच सामना होता. त्याने त्याच्या शतकी खेळीत सहा चौकार आणि पाच षटकार मारले. कर्णधार श्रेयस अय्यर याने 47, सूर्यकुमार यादव याने 34 तर शिवण दुबे याने देखील नाबाद 33 धावांची खेळी केली.
जयस्वाल- तरे यांची 152 धावांची भागीदार
नाणेफेक जिंकून फलंदाजीला उतरलेल्या मुंबईच्या दोन्ही सलामीवीरांनी गोव्याच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 152 धावांची भागीदारी केली. 29 षटकातच या दोघांनी हि धावसंख्या उभारली. त्यानंतर तरे बॅड झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या सिद्धार्थ लाड याच्या साथीने जयस्वाल याने 72 धावा केल्या.
दुबे-यादव यांनी शेवटच्या चार षटकांत झोडल्या 52 धावा
कर्णधार श्रेयस अय्यर याने देखील मैदानावर फलंदाजीला येताच फटकेबाजीला सुरुवात केली. त्याने 20 चेंडूत 47 धावा केल्या. त्यानंतर शिवम दुबे आणि सूर्यकुमार यादव यांनी शेवटच्या चार षटकांमध्ये 52 धावा करत गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली.
कुटुंब आणि घर सोडून मुंबईला गेलेल्या यशस्वीची कहाणी फार प्रेरणादायी आहे. खूप लहान वयातच तो क्रिकेटसाठी उत्तरप्रदेशमधून मुंबईमध्ये आला होता. मुंबईत आल्यानंतर आपल्या काकाच्या राहण्यासाठी जागा कमी असल्यामुळे तो मुस्लिम यूनाइटेड क्लबमध्ये एका तंबूमध्ये राहत असे. त्याने तीन वर्ष तंबूमध्ये दिवस काढले.
पाणीपुरी विक्री , भुका राहिला आणि….
त्याचे वडील अनेकवेळा पैसे पाठवत असत मात्र ते कमी पडत असत. तो रामलीलाच्या वेळी आझाद मैदानावर त्याने कितीतरी वेळा पाणीपुरी विकली. मात्र तरीदेखील त्याला अनेक वेळा उपाशीपोटी राहावे लागत असे. त्यानंतर त्याची भेट एका स्थानिक प्रशिक्षकाशी झाली. त्यानंतर त्याचे आयुष्यच बदलून गेले. आणि आता त्याने नुकताच भारताच्या अंडर -19 संघामधून शानदार कामगिरी केली आहे.
Visit : Policenama.com
- केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहात का? मग रोज ‘हे’ आवश्य खा
- घरच्याघरी तयार करा बाम, डोकेदुखीवर आहे रामबाण, अशी आहे पद्धत
- प्रथमच प्रणायाचा आंनद घेताय ? मग ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, अशी घ्या काळजी
- घसा दुखतोय ? मग करा ‘हे’ खास घरगुती उपाय, ताबडतोब मिळेल आराम
- फॅशन करा पण, आरोग्यावर परिणाम होणार याची काळजी घ्या, ‘हे’ आहेत परिणाम
- ‘हे’ घरगुती उपाय केल्यास खोकला होईल गायब ! आवश्य करून पहा
- ज्येष्ठांनी घ्यावी काळजी, अन्यथा ‘हा’ आजार ठरू शकतो घातक,अशी घ्या काळजी
- उपाशीपोटी खा ‘ही’ ४ फळे, राहाल निरोगी, हृदयासह पचनाचे आजार होतील दूर