ICC World Cup 2019 : ‘या’ कारणामुळे रवी शास्त्री यांच्यावर भडकला कर्णधार कोहली

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत काल झालेल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने भारताचा १८ धावांनी पराभव करत धडाक्यात फायनलमध्ये प्रवेश केला. या सामन्यात रिषभ पंत बाद झाल्यानंतर ज्या प्रकारे कर्णधार कोहली याने रिअ‍ॅक्शन दिली त्यावरून कोहली रवी शास्त्री यांच्यावर चिडला होता का ? रिषभ पंत याच्या कामगिरीवर विराट कोहली खुश नव्हता का ? असा प्रश्न क्रीडा रसिकांना पडला आहे. या सामन्यात भारताची बिकट अवस्था असताना रिषभ पंत चुकीचा फटका खेळून बाद झाल्यानंतर ज्याप्रकारे विराट कोहली याने रिअ‍ॅक्शन दिली त्यावरून कोहली हा रवी शास्त्री यांच्यावर नाराज असल्याचे दिसून येत होते.

याविषयी झाली चर्चा –

सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार कोहलीने या मुद्द्यावर बोलताना सांगितले कि, रिषभ पंत बाद झाल्यानंतर आम्ही याविषयी चर्चा करत होतो. आपण का नाराज झालो होतो याचे देखील त्याने उत्तर दिले. यावेळी बोलताना विराट म्हणाला कि, या प्रकारच्या सामन्यात संघाला छोट्या आव्हानांचा पाठलाग करणे ध्यानात ठेवायला हवे. रिषभ पंत अजून युवा असून त्याला त्याच्या चुका कळत आहेत.

दरम्यान, या वर्ल्डकप स्पर्धेनंतर भारतीय संघ वेस्टइंडीजच्या दौऱ्यावर असून भारतीय संघ या दौऱ्यात कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळणार आहे.

साजूक तुपामुळे होतात ‘हे’ ५ फायदे

अवेळी मासिक पाळी येण्याची ‘ही’ ४ प्रमुख कारणं, ‘ही’ काळजी घ्या

चिडचिडेपणा ‘या’ ५ गोष्टींमुळं वाढतो, जाणून घ्या

दिवसा ‘अवेळी’ झोप येत असेल तर ‘हे’ 4 उपाय करा, जाणून घ्या

झोप न येण्या मागं ‘ही’ कारणं, ‘ही’ काळजी घ्या

डोकेदुखीला ‘या’ घरगुती उपायांनी करा ‘बाय-बाय’

गॅस सिलेंडर लीक होत असल्यास ‘सुरक्षेसाठी’ करा हे उपाय