शेतकऱ्यांसह केंद्र सरकारचा गोडाऊनमधील कोट्यावधीचा कांदा सडतोय, कोट्यावधींचं नुकसान होण्याची शक्यता

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – आज ना उद्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल या अपेक्षेने चाळीत साठवलेल्या शेतकऱ्यांच्या कांद्यासह केंद्र सरकारने कांद्याचे बाजार भाव वाढल्यास ग्राहकांना दिलासा देण्यासाठी नाफेड मार्फत खरेदी केलेला कांदा बदलत्या वातावरणामुळे आद्रता वाढल्याने चाळीत साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणात सडू लागल्याने कोट्यवधीचे नुकसान होण्याची शक्यता.

गेल्यावर्षी चाळीत साठवलेल्या उन्हाळ कांद्याला आणि सुरुवातीला काढलेल्या लाल कांद्याला लासलगाव बाजार समितीत 11 हजार 111 रुपये इतका उच्चांकी ऐतिहासिक बाजारभाव मिळाल्याने यंदा उन्हाळ कांद्याचे लागवड क्षेत्र वाढल्याने 130 टक्के इतके उन्हाळ कांद्याचे उत्पादन झाले यंदाही चांगला बाजारभाव मिळेल या अपेक्षेने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठविला हा चाळीतील कांदा पावसाळी व दमट हवामानामुळे सडु लागल्याने वाढीव बाजार भाव मिळाला नाही उलट हजारो रुपये खर्च करून लागवड खर्चही निघणे मुश्किल झाल्याने तोट्यात कांदा विक्री करावा लागत असल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या कांदा उत्पादकाला सडलेला कांदा उखीरड्यावर फेकून देण्याची वेळ आल्याने केंद्र व राज्य सरकार कांद्याला अनुदान व हमीभाव या सारखी योजना आणून मदतीचा हात देण्याची अपेक्षा कांदा उत्पादक करू लागले आहे.

केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या उद्दिष्टानुसार ग्राहकांच्या हितासाठी नाफेड व महाएफपीसीचा महाओनियन ह्या संयुक्त उपक्रमांतर्गत आत्तापर्यंत 76 कोटी 50 लाख रुपयांचा 900 रुपये सरासरी बाजारभावाप्रमाणे 85 हजार मेट्रिक टन कांद्याची नासिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव बसवंतसह जिल्ह्यातील बाजार समित्या तसेच पुणे, नगर , औरंगाबाद, उस्मानाबाद या जिल्ह्यातून खरेदी केला आहे शेतकऱ्यांच्या कांद्यासह केंद्र सरकारने हा खरेदी केलेला कांदा वातावरणात बदल झाल्याने सडत आहे नाफेडच्या लासलगाव गोडाउनमधून सडलेला कांदा बाजूला काढत आहे या कांद्यातून काळसर दुर्गंधीयुक्त पाणी बाहेर येत असून या पाण्यात आळ्या पडल्या आहे कामगारांना पोटासाठी या दुर्गंधीयुक्त वातावरणात काम करण्याची वेळ आली आहे मोठ्या प्रमाणात कांदा सडत असल्याने कोट्यवधींचा फटका केंद्र सरकारला बसणार आहे.

यंदा कांद्याचे उत्पादन 130 टक्के असतानाही केंद्र सरकारने दरवर्षी पेक्षाही दुपटीने एक लाख मेट्रिक टनापर्यंत कांदा खरेदीचे उद्दिष्ट ठेवून कांद्याची खरेदी सुरू केली बाजार भाव वाढले नाही मात्र कोट्यावधीचा कांदा हा उखड्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांसह केंद्र सरकारने नाफेड मार्फत खरेदी केलेल्या कांद्यावर ही आली आहे वाढीव उत्पादन असताना त्यात कोरोनामुळे देशासह परदेशात लॉक डाऊन करण्याची वेळ आली या दरम्यान केंद्र सरकारने नाफेड मार्फत एप्रिलपासून मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी करून काय साध्य केले असा उलट सवाल करत कोसळत्या कांद्याचा तोटा भरून काढण्यासाठी कांद्याची केंद्राने वाढीव खरेदी न करता पाचशे ते एक हजार रुपये पर्यंत अनुदान दिले पाहिजे होते असे मत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी व्यक्त केले आहे.