मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सायरस मिस्त्री यांची तीन वर्षांपूर्वी म्हणजेच २४ ऑक्टोबर २०१६ रोजी टाटा चेअरमनपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. या विरोधात सायरस मिस्त्री यांनी राष्ट्रीय कंपनी कायदे लवादाकडे दाद मागितली होती. यासंदर्भात लवादाने मिस्त्री यांच्या बाजूने निकाल दिल्याने टाटा समुहाला सायरस मिस्त्री यांची पुनर्नियुक्ती करावी लागणार आहे.
National Company Law Appellate Tribunal(NCLAT) allows the plea of Cyrus Mistry and reinstated him as Chairman of Tata Sons. NCLAT set aside the board order of October 24(2017) which had removed Mistry as Chairman. NCLAT also said that Mistry's removal was illegal. (file pic) pic.twitter.com/to8UNVsEmI
— ANI (@ANI) December 18, 2019
सायरस मिस्त्री यांनी रतन टाटा यांच्या निवृत्तीनंतर २९ डिसेंबर २०१२ रोजी टाटा कंपनीचे चेअरमन पद स्वीकारले होते. तत्पूर्वी, नोव्हेंबर २०११मध्ये सायरस मिस्त्री यांची टाटांचे वारसदार म्हणून डेप्युटी चेअरमनपदी नेमणूक करण्यात आली होती.
सायरस मिस्त्री यांचा जन्म ०४ जुलै १९६८ रोजीचा असून त्यांनी लंडनमधील इंपेरियल कॉलेज ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी आणि मेडिसिनमध्ये सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी लंडन बिझनेस स्कूलमध्ये एमबीए केले आहे.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- लसूण औषधी, पण जास्त प्रमाणात खाल्ल्याने होतात ‘या’ ५ समस्या
- दुधात चिमुटभर खसखस टाकून प्या, ‘हे’ आहेत १० आरोग्यदायी फायदे
- रक्तदानाबाबत लोकांमध्ये असतात ‘हे’ ६ गैरसमज ! जाणून घ्या सत्य
- ‘फॅटी लिव्हर’ची समस्या काय आहे ? जाणून घ्या २ प्रकार आणि ४ लक्षणे
- तंबाखूच्या व्यसनामुळे घटते शुक्राणूंची निर्मिती, ‘हे’ आहेत १० गंभीर परिणाम
- उपवास केल्याने होतात हे १४ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या
- ‘हे’ असू शकते जुनाट आजाराचे मूळ, वेळीच लक्ष देऊन करा हे उपाय