हिंमत असले तर आमच्याशी ‘पंगा’ घ्या, भाजपच्या चंद्रकांत पाटलांचे CM ठाकरेंना ‘आव्हान’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील गावा-गावातले रस्ते, 12 हजार कोटींच्या पाण्याच्या योजना, सारथी म्हणजे मराठा-कुणबींना सुविधा असे सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय रद्द करुन तुम्ही कुणावर सूड उगवातय ? हिंमत असेल तर आमच्याशी पंगा घ्या, आम्ही तयार आहोत, असे आव्हान चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. आज औरंगाबादमध्ये भाजपची विभागीय आढावा बैठक होती. बैठकीपूर्वी चंद्रकांत पाटील प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

जे निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचे आहेत, ते रद्द करुन काय मिळवणार आहात, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केला आहे. या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणीक यांच्यासह मराठवाड्यातील प्रदेश पातळीवरील नेते उपस्थित आहेत.

चंद्रकांत पाटील म्हणाले, मराठा आणि कुणबी समाजाच्या हितासाठी आमच्या सरकारने सारथी ही स्वायत्ता संस्था स्थापन केली होती. त्यासाठी महत्त्वाच्या व्यक्तींची त्या ठिकाणी नियुक्ती करून मराठा समाजाच्या तरुणांच्या विकासासाठी काम सुरु केले होते. मात्र, या सरकारने सारथी सारख्या संस्थेची स्वायत्तता सरकार काढून घेतले. थोडक्यात काय तर त्यांना काहीच करायचे नसल्याचे पाटील यांनी म्हटले. सारथीसारख्या स्वायत्ता संस्थेवर मर्यादा आल्यामुळे मराठा आणि कुणबी समाजातून प्रतिक्रीया उमटतील. त्यामुळे सरकारला आवाहन आहे की, काय पंगा आहे, तो तुमचा आमचा राजकीय आहे, असेही पाटील म्हणाले.

Visit : Policenama.com